‘अंधारापासून प्रकाशाकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे’

Share

प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

अशी यात्रा घडवून आणतं संतसाहित्य! यातील ‘गीता’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांचा आपण विचार करतो आहोत. हे केवळ ग्रंथ राहत नाहीत, ते ज्ञान देणारे साक्षात गुरू होतात. यात अर्जुनाच्या निमित्ताने माणसाच्या आयुष्यात अपेक्षित परिवर्तन दाखवलं आहे. पण हे परिवर्तन एकदम होत नाही, ते टप्प्याटप्प्याने होतं. या टप्प्याची सुंदर चित्र ज्ञानदेव साकारतात. याचं प्रत्यंतर देणाऱ्या अठराव्या अध्यायातील अद्भुत ओव्या आता पाहूया. ‘मी म्हणजे माझा देह नाही’ ही जाणीव साधकाला होते. मग त्याचा कर्तेपणाचा अभिमान नाहीसा होतो. हा ज्ञानमार्गाचा प्रवासी होय. देहाचा अभिमान नष्ट झाला तरी त्याच्याकडून कर्म होत असतात. हे तत्त्व स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी असे अप्रतिम दृष्टान्त
दिले आहेत!

‘वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, अथवा कापूर जरी संपला तरी करंड्यात वास शिल्लक असतो.’ ‘गाण्याचा समारंभ संपला तरी गाणं ऐकून मनाला झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले तरी जशी त्याची ओल मागे राहते.’ ‘अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज (संधिप्रकाश) जसे दिसते.’ ओवी क्र. ४२३ ते ४२५

या प्रत्येक दाखल्यात किती अर्थ भरला आहे आणि सुंदरतादेखील! वारा हे एक तत्त्व आहे. ‘वाहणं’ हा त्याचा गुणधर्म आहे. पण झाडांतून वारा वाहायचा थांबला, तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, कारण त्याने झाडाला गती दिलेली असते. त्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचा ‘मी’ पणाचा वारा वाहायचा थांबतो, पण त्याच्याकडून कर्म होत राहतात. इथे माऊलींनी ‘वारा’ म्हणजे स्पर्श संवेदना वापरली आहे. यानंतर येते गंध संवेदना होय. कापूर जळून गेला तरी त्याचा गंध उरतो. त्याप्रमाणे साधकाचा देहाचा अभिमान नाहीसा होतो, तरी तो शरीराने कर्म करीत असतो.

यापुढील दृष्टान्तात येते ‘नाद’ ही संवेदना. गाण्याचा समारंभ संपला तरी त्यातून मिळालेला आनंद मागे राहतो. त्याप्रमाणे साधकाचं ‘मी’ पण सरलं तरी शरीराकडून व्यवहार / क्रिया होत राहतात. यापुढील दाखला अगदी अप्रतिम! पाण्याने जमीन ओली होणे याचा अर्थ साधकाचा जीवनप्रवाह सुरू असणे, पाणी कमी होणे म्हणजे त्याची आसक्ती नाहीशी होत जाणे, कर्म ‘मी’ केले हा अभिमान नाहीसा होणे. तरीही ओल कायम राहणे म्हणजे जीवनव्यवहार चालू असणे होय. ही अर्थपूर्ण ओवी अशी-

कां सरलेया गीताचा समारंभु। न वचे राहिलेपणाचा क्षोभु।
भूमी लोळोनि गेलिया अंबु। वोल थारे॥’ ओवी क्र. ४२४
‘क्षोभु’ शब्दाचा अर्थ भर, ‘न वचे’ म्हणजे जात नाही. ‘अंबु’ म्हणजे पाणी तर ‘वोल’ शब्दाचा अर्थ ओलावा असा आहे. ज्ञानदेवांनी या ओवीत किती सुंदरतेने परिवर्तनाचे चित्र रेखाटले आहे ‘भूमी लोळोनि गेलिया अंबु’ अशा शब्दांत! ‘लोळणं’ हे क्रियापद आपल्याला आठवण करून देते लहान मुलांची! ती जमिनीवर लोळतात. इथे लोळणारा आहे पाण्याचा थेंब.
‘ही ज्ञानदेवांची तरल कल्पनाशक्ती सुंदरतेने साकारते गीतेची उक्ती!’

manisharaorane196@ gmail.com

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

1 minute ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago