का गरजेचे आहे Marriage Certificate बनवणे? जाणून घ्या आजच

मुंबई: सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या दरम्यान लग्नानंतर नवरा-नवरीला लग्नाचे प्रमाणपत्र बनवावे लागते. मात्र जर असे केले नाही तर?


लग्नाचे प्रमाणपत्र हे एक गरजेचे कागदपत्र आहे ज्यामुळे विवाहाला अधिकृत मान्यता मिळते. दोन व्यक्तींचे लग्न झाले असून ते वैध आहे हे लग्न प्रमाणपत्र दाखवते. लग्न प्रमाणपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे जे लग्न वैध असल्याचे दाखवते. एखादा विवाह कोर्ट, मंदिर, चर्च, मस्जिद या ठिकाणी झाल्यास या विवाहाचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून दिले जाते. विवाहासंबंधी एखादा कायदेशीर वाद झाल्यास हे प्रमाणपत्र फायदेशीर ठरते.


सोबतच या प्रमाणपत्राचा उपयोग संपत्ती, धन आणि इतर कायदेशीर अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केला जातो. जर एखाद्या पती अथवा पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते याचा पुरावा हे प्रमाणपत्र देते. यामुळे संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहतो.


सोबतच पासपोर्ट अथवा व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अथवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल अथवा विवाहाच्या नावाने सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर लग्न प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक