Ramdas Athawale : आम्हाला पण कॅबिनेट मंत्रीपद हवं, अमित शाहांनी शब्द दिला होता!

रामदास आठवले यांची मागणी


मुंबई : अखेर महायुतीने (Mahayuti) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.



तत्पूर्वी, भाजपा विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे ठरले आहे. यातच आता रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान हवे असल्याची मागणी केली आहे.


या घडामोडींवर मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असे रामदास आठवले यांनी सागितले.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे