Ramdas Athawale : आम्हाला पण कॅबिनेट मंत्रीपद हवं, अमित शाहांनी शब्द दिला होता!

  74

रामदास आठवले यांची मागणी


मुंबई : अखेर महायुतीने (Mahayuti) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.



तत्पूर्वी, भाजपा विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे ठरले आहे. यातच आता रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान हवे असल्याची मागणी केली आहे.


या घडामोडींवर मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असे रामदास आठवले यांनी सागितले.

Comments
Add Comment

Health: दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे फक्त इच्छा असून साध्य होत

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली