Ramdas Athawale : आम्हाला पण कॅबिनेट मंत्रीपद हवं, अमित शाहांनी शब्द दिला होता!

रामदास आठवले यांची मागणी


मुंबई : अखेर महायुतीने (Mahayuti) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.



तत्पूर्वी, भाजपा विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे ठरले आहे. यातच आता रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान हवे असल्याची मागणी केली आहे.


या घडामोडींवर मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असे रामदास आठवले यांनी सागितले.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे