Indian Navy Day : भारतीय नौदल दिनाचे पाकिस्तान कनेक्शन ? जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा इतिहास

नवी दिल्ली : भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नौदलाच्या इतिहासातील हा दिवस एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ऐतिहासिक महत्त्व आहे कारण भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानचा पराभव केला होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो.


हा ऐतिहासिक दिवस भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याला हा दिवस आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आज भारतीय नौदल दिनानिमित्त जाणून घेऊया भारतीय नौदलाची स्थापना केव्हा आणि कशी झाली? भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?



भारतीय नौदल दिनाचा इतिहास


भारतीय नौदलाची स्थापना इ.स. १६१२ मध्ये झाली होती. तेव्हा त्याला "इंडियन मॅरिटाइम सिक्युरिटी एजंसी" असे नाव देण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला "भारतीय नौदल" असं नाव देण्यात आले.



४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?


४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचे कारण १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. पाकिस्तानने या युद्धात ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.



भारतीय नौदलाची स्थापना


तज्ञांच्या मते, भारतीय नौदल १६१२ मध्ये अस्तित्वात आली, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाची नौदल तयार केली. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या