Indian Navy Day : भारतीय नौदल दिनाचे पाकिस्तान कनेक्शन ? जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा इतिहास

नवी दिल्ली : भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नौदलाच्या इतिहासातील हा दिवस एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ऐतिहासिक महत्त्व आहे कारण भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानचा पराभव केला होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो.


हा ऐतिहासिक दिवस भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याला हा दिवस आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आज भारतीय नौदल दिनानिमित्त जाणून घेऊया भारतीय नौदलाची स्थापना केव्हा आणि कशी झाली? भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?



भारतीय नौदल दिनाचा इतिहास


भारतीय नौदलाची स्थापना इ.स. १६१२ मध्ये झाली होती. तेव्हा त्याला "इंडियन मॅरिटाइम सिक्युरिटी एजंसी" असे नाव देण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला "भारतीय नौदल" असं नाव देण्यात आले.



४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?


४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचे कारण १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. पाकिस्तानने या युद्धात ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.



भारतीय नौदलाची स्थापना


तज्ञांच्या मते, भारतीय नौदल १६१२ मध्ये अस्तित्वात आली, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाची नौदल तयार केली. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

Comments
Add Comment

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: "शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते"; पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी

India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब

राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या