बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी

ढाका : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट २००६ अंतर्गत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे असा दावा याचिकाकर्ते इखलास उद्दीन भुईयाँ यांनी या याचिकेत केला आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालयाचे सचिव, बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.या अर्जावरील सुनावणी बांगलादेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तर या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

Comments
Add Comment

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे मोठे नुकसान

होर्मुझवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींची कुवेतच्या युवराजांशी चर्चा; प्रादेशिक शांततेवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून

आर्थिक संकटातही पाकिस्तान तयार करतोय अण्वस्त्र ; पहिल्यांदाच अमेरिकेने केले पाकिस्तानवर थेट आरोप

- पाकिस्तानकडून अमेरिकेला थेट धोका निर्माण होणार ? इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक