बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी

ढाका : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट २००६ अंतर्गत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे असा दावा याचिकाकर्ते इखलास उद्दीन भुईयाँ यांनी या याचिकेत केला आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालयाचे सचिव, बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.या अर्जावरील सुनावणी बांगलादेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तर या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

Comments
Add Comment

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून

हाँगकाँगमधील भीषण आगीचे कारण आले समोर; आगीत ५५ जणांचा मृत्यू, २७९ अजूनही बेपत्ता

हाँगकाँग : हाँगकाँगमधील Tai Po District मध्ये बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेत

गौरवशाली क्षण! युनेस्कोच्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई: संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या

व्हाईट हाऊस परिसरात राष्ट्रीय रक्षकांवर गोळीबार! 'आरोपीला खूप मोठी किंमत मोजावी लागणार' ट्रम्प यांचा इशारा

अमेरिका: जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट