PV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणारा नवरा आहे तरी कोण ?

नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या उत्तम खेळाने अनेक स्पर्धांत यश मिळवणारी, भारताचं नाव उज्ज्वल करणारी स्टार खेळाडू, बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आता आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे २२ डिसेंबर रोजी पीव्ही सिंधूचा विवाह सोहळा पार पडणार आहे. पीव्ही सिंधूच्या वडिलांनी काल, २ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासमोबत शेअर केली. भारतीय स्टार खेळाडू पीव्ही सिंधूचं लग्न कधी होणार, कोणाशी होणार, मुलगा कोण आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना भरूपर उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया…



कोण आहे व्यंकट दत्ता साई?


सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. व्यंकट दत्ता साई यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि ते इंडियन रेवेन्यू सर्विसमध्ये (IRS) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीव्ही सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लाँच केला होता. आता लवकरच पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकणार आहेत.पीव्ही सिंधूच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होतील आणि २४  डिसेंबरला दोन्ही कुटुंबे हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजनही करणार आहेत.






लेक सिटी उदयपूरमध्ये होणार विवाह


पीव्ही सिंधूने १ डिसेंबर रोजी सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकून चाहत्यांना आनंदित करून आता तिने सर्वाना डबल सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. सिंधूचे पिता पी.व्ही. रमण्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थामधील ‘लेक सिटी’ (तलावांचं शहर) उदयपूरमध्ये येत्या २२ डिसेंबरला हा लग्न सोहळा होईल. दोघांचंही कुटुंब बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतं आहे. महिन्याभरापूर्वीच लग्नाचा निर्णय झाला. मात्र सिंधूचं व्यस्त वेळापत्रक पाहता, २२ डिसेंबर ही तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली. २० डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होतील आणि २२ डिसेंबरला सिंधू आणि वेंकट विधींवत एकमेकांशी लग्नगाठ बांधतील, असेही तिच्या वडिलांनी सांगितले. यानंतर २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत