काव्यरंग : पोंक्षे महाराज

  9

नुकतेच माझे, लग्न होते त्यावेळी ठरलेले,
सगळेजण माझ्या सासरच्या घरी जमलेले.


सजला होता बंगला फुलझाडांत वेलीत,
महत्त्वाची बोलणी होती बैठकीच्या खोलीत.


बोलताना मधेच सासुबाईंना म्हणाले दीर,
“पोंक्षे महाराज” आले आहेत बाहेर, होऊनी अधीर.


सासुबाई म्हणाल्या, ‘‘थांबू देत” थोडावेळ,
आधी खरेदीच्या चर्चेचा बसू दे ताळमेळ.


थोडा वेळ थांबून दिरांनी पाहिले वाकून,
पोंक्षेंच्या स्वारीने दिले होते स्वतःला, खुर्चीत झोकून.


“अशी काय ही माणसे?” आले माझ्या मनी,
बाहेर का ताटकळत ठेवावे दुसऱ्याला कुणी.


एक तर, काम त्याचे करून टाकावे पटकन,
नाहीतर, त्याला आत तरी बोलवावे झटकन.


चहाची वेळ झाली, आवाज केला कप बशीने,
“पोंक्षे महाराज”, इकडेच येत होते म्हणे स्वखुशीने.


दिरांनी पुन्हा सासुबाईंना होते खुणावले,
आता “त्या दोघांचे” लक्ष, बाहेर होते स्थिरावले.


कोण येते आहे याचे पडले होते मला कोडे,
पुरुषभर उंचीच्या अपेक्षेने पाहिले मी दाराकडे.


सासूबाई, नवरा सगळे पाहत होते कौतुकाने,
दारातून प्रवेश केला एका “गलेलठ्ठ” बोक्याने.


नवरा म्हणाला मला, हा आमचा‘‘पोंक्षे महाराज’’,
मांजराला “महाराज” म्हणतात, कळले मला आज.


“हेच” नाव ठेवण्याचे विचारले मी त्यांना कारण,
सासऱ्यांचे निकटचे मित्र होते त्याचे स्पष्टीकरण.


खास मित्र पोंक्षेंनी दिली सासऱ्यांना प्रेमाने भेट,
बोकाही त्यांच्यासारखाच होता घारागोरा थेट.


झाल्या सगळ्या प्रकाराने खूप हसू मला फुटले,
सासरी गेल्यानंतर “पोंक्षे महाराज” ही मला पटले.
- मृणाल ठाकुरदेसाई, अंबरनाथ

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,