नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे काँग्रेसचा पराभव- खरगे

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नेत्यांची बेताल वक्तव्य आणि एकतेचा अभाव ही कारणीभूत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये खरगे यांच्या नेतृत्वात पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही उपस्थित होते.


खरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता. मात्र त्यानंतर तीन राज्यांत निवडणुका झाल्या तिथे आपल्याला जी अपेक्षा होती, त्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडी आघाडीनं चार पैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं, मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती.


मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत, त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद, एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंट यांमुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, जर हे वेळीच थांबवलं गेलं नाही, तर याचा मोठा फटका हा आपल्या पक्षाला बसू शकतो. ज्या राज्यात आपला पराभव झाला तिथे आपली संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाही. आपल्याला त्या राज्यात आपलं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची एक मजबूत मोट आपल्याला बांधावी लागणार आहे. सोबतच त्या-त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल

Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा