Uday Samant : शिंदेंच्या भूमिकेनंतर विरोधकांची कोल्हेकुई थांबली; शिवसेना उपनेते उदय सामंत यांची टीका

Share

मुंबई : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांची महायुती टिकून राहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत काल भूमिका स्पष्ट केली. यातून एक संवेदनशील, भावनाप्रधान लोकांमध्ये जाऊन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला असे शिवसेना उपनेते उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्या भूमिकेने राज्यात सुरु असलेली विरोधकांची कोल्हेकुई थांबली, अशी टीका सामंत यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि शिवसेनेची भूमिका काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

पाच वर्षापूर्वी शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालेले असताना सत्तेसाठी ३४ दिवस शिवसेना आमदारांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर खुर्चीसाठी शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांपासून सुरु असलेले नैसर्गिक युती तुटली आणि आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्यावर जाऊन बसला, अशी खरमरीत टीका सामंत यांनी उबाठावर केली. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन रडायचं नसते तर लढायचे असते, असा संदेश काल शिंदे यांनी दिला. महाराष्ट्राच्या जनतेची शेवटपर्यंत सेवा करणार असेही शिंदे म्हणाले. भाजपाच्या वरिष्ठांनी अडीच वर्ष दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ती कोट्यवधी जनतेसमोर मांडण्याचा राजकारणातील सुसंस्कृतपणा शिंदे यांनी काल दाखवला, असे सामंत म्हणाले.

विरोधकांनी किती टीका केली तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ विरोधी पक्षांना मिळाले नाही त्यामुळे त्यांनी शिंदेवर टीका करण्या ऐवजी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला सामंत यांनी लगावला. ते म्हणाले की, २० आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. उबाठाला काँग्रेसचे आदेश पाळावे लागतात. महाराष्ट्रात भारत जोडो दरम्यान काँग्रेस नेत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता. त्याबाबत निषेध न करता सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, अशी टीका सामंत यांनी केली. निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, लवकरच त्याचा उलगडा होईल, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार कोटींचे प्रकल्प आले. रिफायनरीबाबत सरकार स्थापन झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. रिफायनरीबाबत राजकारण करणाऱ्यांना कोकणातील जनतेने घरी बसवले, असे ते (Uday Samant) म्हणाले.

Tags: uday samant

Recent Posts

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

10 minutes ago

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

3 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago