Uday Samant : शिंदेंच्या भूमिकेनंतर विरोधकांची कोल्हेकुई थांबली; शिवसेना उपनेते उदय सामंत यांची टीका

मुंबई : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांची महायुती टिकून राहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत काल भूमिका स्पष्ट केली. यातून एक संवेदनशील, भावनाप्रधान लोकांमध्ये जाऊन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला असे शिवसेना उपनेते उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्या भूमिकेने राज्यात सुरु असलेली विरोधकांची कोल्हेकुई थांबली, अशी टीका सामंत यांनी यावेळी केली.


ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि शिवसेनेची भूमिका काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.



पाच वर्षापूर्वी शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालेले असताना सत्तेसाठी ३४ दिवस शिवसेना आमदारांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर खुर्चीसाठी शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांपासून सुरु असलेले नैसर्गिक युती तुटली आणि आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्यावर जाऊन बसला, अशी खरमरीत टीका सामंत यांनी उबाठावर केली. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन रडायचं नसते तर लढायचे असते, असा संदेश काल शिंदे यांनी दिला. महाराष्ट्राच्या जनतेची शेवटपर्यंत सेवा करणार असेही शिंदे म्हणाले. भाजपाच्या वरिष्ठांनी अडीच वर्ष दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ती कोट्यवधी जनतेसमोर मांडण्याचा राजकारणातील सुसंस्कृतपणा शिंदे यांनी काल दाखवला, असे सामंत म्हणाले.


विरोधकांनी किती टीका केली तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ विरोधी पक्षांना मिळाले नाही त्यामुळे त्यांनी शिंदेवर टीका करण्या ऐवजी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला सामंत यांनी लगावला. ते म्हणाले की, २० आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. उबाठाला काँग्रेसचे आदेश पाळावे लागतात. महाराष्ट्रात भारत जोडो दरम्यान काँग्रेस नेत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता. त्याबाबत निषेध न करता सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, अशी टीका सामंत यांनी केली. निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, लवकरच त्याचा उलगडा होईल, असे ते म्हणाले.


एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार कोटींचे प्रकल्प आले. रिफायनरीबाबत सरकार स्थापन झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. रिफायनरीबाबत राजकारण करणाऱ्यांना कोकणातील जनतेने घरी बसवले, असे ते (Uday Samant) म्हणाले.

Comments
Add Comment

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती