आनंदी अमृतपान

ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


अमृताने भरलेल्या अवीट गोडीचा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’! त्याचा समारोप होतो, त्यावेळी ज्ञानदेव या ग्रंथाचे अलौकिक स्वरूप सांगतात. अर्थात या मागे श्रीनिवृत्तीनाथांची कृपा हे ते आवर्जून नमूद करतात. या ‘ज्ञानेश्वरी’च्या रचनेसाठी त्यांनी ‘ओवी’ हा प्रकार निवडला. त्याचे वर्णन ऐकूया त्यांच्याच शब्दांत...



‘अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळी घेतली तरी त्यांच्या वासात कमीपणा नसतो,’ ओवी क्र. १७३९


‘तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो, आणि गाणारा नसला तरी त्याचे तेज पडते. असा सर्व लाभदायक ओवीप्रबंधाने मी हा ग्रंथ केला आहे.’ ओवी क्र. १७४०


या ग्रंथात आबालवृद्धांस समजण्याजोग्या ओवीच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे.’ ओवी क्र. १७४१


ही ओवी अशी –
ना ना गुंफिलीं कां मोकळीं। उणीं न होती परिमळीं।
वसंतागमींची वाटोळीं। मोगरीं जैसीं॥
मोगऱ्याची फुले आपण सर्वांनी पाहिली आहेत. कशी असतात ती? सुंदर. त्यांना एक खास गोलाई असते. ही गोलाई ज्ञानदेवांनी ओवींमधील शब्दांतही आणली आहे. ही त्यांची प्रतिभा! त्यासाठी त्यांनी ‘ळी’ या अक्षराची पुन्हा पुन्हा योजना केली आहे. ‘ळ’ या अक्षरात गोलपण आहे. पण ‘ळी’ केले की, त्यात वेलांटीमुळे ते अधिकच वाढते. ‘ळी’ या अक्षरात मोगऱ्याचे फूल दिसते दृष्टीला! अर्थाचा विचार आपण करूच, पण केवळ शब्दांचा विचार केला तरी यातील नजाकत जाणवते. आता पाहा याचा अर्थही किती साजेसा! ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथासाठी योजलेला आहे ‘ओवी’ हा रचनाप्रकार. तो कशाप्रमाणे आहे? तर जणू मोगऱ्याच्या फुलांप्रमाणे. मोकळी किंवा गुंफलेली कशीही असोत, ती सुगंध देणार. त्याप्रमाणे ‘ओवी’ हा रचनाबंध आहे. ज्याला गाता येते, त्याने या ओव्या गाव्या, त्यातील आनंद घ्यावा. ज्याला गाता येत नाही त्यानेदेखील याचा आनंद घ्यावा, कारण यात नादमयता असते. पुढे ज्ञानदेवांनी या ग्रंथाचा अजून एक विशेष सांगितला आहे की, तो लहांनापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना समजण्यासारखा आहे. त्यातील अक्षरे तर ब्रह्मरसाने भरलेली आहेत.


हे सांगण्याचे कारण म्हणजे हा ग्रंथ ज्यावर आधारित आहे, ती ‘गीता’ अशी अवीट गोडीची आहे; परंतु ती संस्कृतमध्ये असल्याने समाजातील ठरावीक वर्गापुरती होती. म्हणून सर्व समाजासाठी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने मराठीत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली. त्यामुळे ती सगळ्यांना समजण्याजोगी झाली. त्यात ज्ञानदेवांनी त्यासाठी ‘ओवी’ हा रचनाप्रकार निवडला. हा प्रकार ऐकायला गोड, कळायला सोपा, सुटसुटीत आहे. मोगऱ्याच्या एकेका मोकळ्या फुलात जी सुंदरता, सुगंध आहे, तशी यातील एकेका शब्दांत सुंदरता आहे, अर्थाचा सुगंध आहे. सुगंधी फुलात मध असतो, तर ज्ञानेश्वरीतील अक्षरांत ब्रह्मज्ञानाचा मध आहे. मग अशा अवीट ग्रंथाचा आनंद आपण सगळ्यांनी का घेऊ नये? तर चला, करूया सुरुवात या अमृतपानाला!


manisharaorane196@gmail.com

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा