Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

जेवताना की जेवणानंतर? कधी प्यायले पाहिजे पाणी...घ्या जाणून

जेवताना की जेवणानंतर? कधी प्यायले पाहिजे पाणी...घ्या जाणून
मुंबई: प्रत्येक ठिकाणी जेवण वाढताना टेबलवर पाणी ठेवणे गरजेचे असते. अनेकदा घास घश्याला लागू शकतो त्यामुळे पाणी जेवताना ठेवले पाहिजे. मात्र अनेकांना जेवतानाही मध्येमध्ये पाणी पिण्याची सवय असते.

अनेकदा लोक जास्त पाणी प्यायल्यामुळे आपले जेवण संपवू शकत नाहीत. यामुळे असा सल्ला दिला जातो की जेवताना पाणी पिऊ नये. इतकंच नव्हे तर जेवताना पाणी प्यायलो तर त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. कारण यामुळे शरीरात भोजन व्यवस्थित पचत नाही.

जेवणादरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य


जेवताना आणि जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते. शरीरात हायड्रेशन कायम राखण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. पोटातून गॅस्ट्रिक अॅसिड प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन करतो. यामुळे जेवण पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम सक्रिय करण्यात आणि हानिकारक बॅक्टेरिया मारण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

जेवणासोबत पाणी पिण्याचे फायदे


पाणी प्यायल्याने अन्नाचे कण नरम होण्यास मदत मिळते. यामुळे पोटातील अन्न पचण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट भरल्याभरल्यासारखे वाटते. यामुळे अधिक खाल्ले जात नाही आणि पोट साफ राहण्यासही मदत होते.
Comments
Add Comment