Rishabh Pant: IPL लिलावात ऋषभ पंतने मोडला रेकॉर्ड, ठरला सर्वात महागडा खेळाडू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५साठीचा(IPL) मेगा लिलाव सुरू झाला आहे. हा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये होत आहे. पहिल्या दिवशी सर्वांच्या नजरा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर होत्या. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त बोली लावत २७ कोटी रूपयांना खरेदी केले. या पद्धतीने पंतने २० मिनिटांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा रेकॉर्ड तोडला.


पंतने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचने नेतृत्व केले होते. त्याला दिल्ली संघाला रिटेन केले नव्हते. अशातच पंत २०१६ नंतर पहिल्यांदा लिलावात उतरला. दरम्यान, पंत दिल्लीने आरटीएम कार्ड नियमाचा वापर केला होता. मात्र अखेरीस लखनऊ संघाने मोठी बोली लावत पंतला खरेदी केले.



RTM कार्डमुळे २७ कोटींचा विकला गेला पंत


खरंतर, ऋषभ पंतची बोली जेव्हा २०.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डचा वापर केला. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने या लिलावासाठी २७ कोटी रूपये केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा पंतसाठी आरटीएम करण्यास रस दाखवला नाही.


पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जोरदार बोली लावली. यानंतर सनरायजर्स हैदराबादने एंट्री घेतली. दोघांमध्ये ही बोली २०.७५ कोटीपर्यंत पोहोचली होती.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स