Rishabh Pant: IPL लिलावात ऋषभ पंतने मोडला रेकॉर्ड, ठरला सर्वात महागडा खेळाडू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५साठीचा(IPL) मेगा लिलाव सुरू झाला आहे. हा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये होत आहे. पहिल्या दिवशी सर्वांच्या नजरा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर होत्या. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त बोली लावत २७ कोटी रूपयांना खरेदी केले. या पद्धतीने पंतने २० मिनिटांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा रेकॉर्ड तोडला.


पंतने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचने नेतृत्व केले होते. त्याला दिल्ली संघाला रिटेन केले नव्हते. अशातच पंत २०१६ नंतर पहिल्यांदा लिलावात उतरला. दरम्यान, पंत दिल्लीने आरटीएम कार्ड नियमाचा वापर केला होता. मात्र अखेरीस लखनऊ संघाने मोठी बोली लावत पंतला खरेदी केले.



RTM कार्डमुळे २७ कोटींचा विकला गेला पंत


खरंतर, ऋषभ पंतची बोली जेव्हा २०.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डचा वापर केला. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने या लिलावासाठी २७ कोटी रूपये केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा पंतसाठी आरटीएम करण्यास रस दाखवला नाही.


पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जोरदार बोली लावली. यानंतर सनरायजर्स हैदराबादने एंट्री घेतली. दोघांमध्ये ही बोली २०.७५ कोटीपर्यंत पोहोचली होती.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या