Assembly election result: राज्यात महायुतीचा ऐतिहासिक विजय, झारखंडमध्ये हेमंत सोरेन रिटर्न, पोटनिवडणुकीत भाजपला फायदा

मुंबई: दोन राज्यांमधील विधानसभा, १५ राज्यांमधील ४० जागांवर विधानसभा पोटनिवडणूक आणि दोन लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल शनिवारी जाहीर झाले. लोकसभा निवडणुकीनंतर अर्ध्या भारतीयांचा कल दाखवणारा हा निकाल आहे. येथे सकाळपासून वादळ, सुनामी अशा चर्चा होत होत्या. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक.


या निवडणुकीत विरोधी पक्षांचा धुरळाच उडाला. येथे जितक्या जागा विरोधी पक्षाला मिळाल्या त्यापेक्षा दुपटीने अधिक जागा एकट्या भाजपने मिळवल्या. राज्यात विरोधी पक्ष बनण्याइतक्या जागाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळवत्या आल्या नाहीत. पन्नास वर्षांच्या इतिहासात महाराष्टात एखाद्या युतीने मिळवलेला हा जबरदस्त विजय आहे.


फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास २०१४मध्ये २७.८ टक्के आणि १२२ जागा. २०१९मध्ये २५.८ टक्के आणि १०५ जागा. २०२४मध्ये २६ टक्के आणि १३० पेक्षा अधिक जागा. भाजप असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी राज्यात सलग तीन विधानसभा निवडणुकीत १००हून अधिक जागा निवडल्या आहेत. यावेळेस तर भाजपचा स्ट्राईक रेट ८८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच पक्षाने १४९ जागा लढवून १३१ जागा जिंकल्या आहेत.



भाजपचा पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय


भाजपने केवळ राज्यातच नव्हे तर १५ राज्यांतील ४८विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही विजय मिळवला आहे. भारतीय जनतेने भाजप आणि युतीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. काँग्रेसकडे या पोटनिवडणुकीआधी १३ जागा होत्या. त्यांना केवळ ७ जागाच वाचवता आल्या. तर भाजपकडे आधी केवळ ११ जागा होत्या. मात्र आता भाजपची संख्या २०वर पोहोचली आहे. तर एनडीएच्या खात्यात ४८ पैकी २८जागा आहेत. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानातील आपला दबदबा कायम राखला.



झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची सत्ता कायम


झारखंड विधानसभा निवडणुकीत निकालाबाबत बोलायचे झाल्यास झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतृत्व करणार INDIA आघाडीने जबरदस्त कामगिरी करत बहुमत मिळवले. झारखंडमध्ये इडिया आघाडीला ५६ जागा मिळाल्या. तर एनडीएला २४ जागांवर विजय मिळवता आला. झारखंडने २४ वर्षांची जुनी परंपरा मोडली आणि सत्तारूढ पक्षाने जोरदार कमबॅक केले.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि