Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

मुंबई: भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या(Champions Trophy) फायनलमध्ये चीनला हरवत खिताब जिंकला आहे. ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे. सामन्याचा एकमेव गोल भारताकडून दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फायनल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.


भारत आणि चीन यांच्यात खेळवण्यात आलेला फायनल सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. म्हणजेच हाफ टाईमपर्यंत एकही गोल झाला नाही. मात्र तिसरा क्वार्टर सुरू होण्याच्या पहिल्या मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. चीनने शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.



भारत तिसऱ्यांदा बनला चॅम्पियन


भारताने याआधी दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा(Champions Trophy)खिताब जिंकला आहे. २०१६मध्ये टीम इंडियाने चीनला रोमहर्षक सामन्यात २-१ असे हरवले होते. तर २०२३मध्ये भारतीय संघाने जपानला ४-० असे हरवले होते. गेल्या पाच स्पर्धेत भारताने हा खिताब तिसऱ्यांदा जिंकला आहे.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स