Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

  68

मुंबई: भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या(Champions Trophy) फायनलमध्ये चीनला हरवत खिताब जिंकला आहे. ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे. सामन्याचा एकमेव गोल भारताकडून दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फायनल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.


भारत आणि चीन यांच्यात खेळवण्यात आलेला फायनल सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. म्हणजेच हाफ टाईमपर्यंत एकही गोल झाला नाही. मात्र तिसरा क्वार्टर सुरू होण्याच्या पहिल्या मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. चीनने शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.



भारत तिसऱ्यांदा बनला चॅम्पियन


भारताने याआधी दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा(Champions Trophy)खिताब जिंकला आहे. २०१६मध्ये टीम इंडियाने चीनला रोमहर्षक सामन्यात २-१ असे हरवले होते. तर २०२३मध्ये भारतीय संघाने जपानला ४-० असे हरवले होते. गेल्या पाच स्पर्धेत भारताने हा खिताब तिसऱ्यांदा जिंकला आहे.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता