Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

मुंबई: भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या(Champions Trophy) फायनलमध्ये चीनला हरवत खिताब जिंकला आहे. ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे. सामन्याचा एकमेव गोल भारताकडून दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फायनल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.


भारत आणि चीन यांच्यात खेळवण्यात आलेला फायनल सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. म्हणजेच हाफ टाईमपर्यंत एकही गोल झाला नाही. मात्र तिसरा क्वार्टर सुरू होण्याच्या पहिल्या मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. चीनने शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.



भारत तिसऱ्यांदा बनला चॅम्पियन


भारताने याआधी दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा(Champions Trophy)खिताब जिंकला आहे. २०१६मध्ये टीम इंडियाने चीनला रोमहर्षक सामन्यात २-१ असे हरवले होते. तर २०२३मध्ये भारतीय संघाने जपानला ४-० असे हरवले होते. गेल्या पाच स्पर्धेत भारताने हा खिताब तिसऱ्यांदा जिंकला आहे.

Comments
Add Comment

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये