Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माच्या घरी आली खुशखबर!

मुंबई: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या घरी खुशखबर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दुसऱ्यांदा बाबा बनल्याचा दावा केला जात आहे. त्याची पत्नी रितीका सजदेहने मुलाला जन्म दिला आहे. रोहित आणि रितीकाबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, आतापर्यंत रोहित अथवा रितीका यांच्याकडून याबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.


टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यासाठी विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. मात्र रोहित अद्याप गेलेला नाही. रोहितने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सुट्टीची मागणी केली होती. रोहितची पत्नी रितीका मुलाला जन्म देणार होती. आता मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की रितीकाने मुलाला जन्म दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.


रोहित आणि रितीकाने २०१५मध्ये लग्न केले होते. रितीकाने डिसेंबर २०१८मध्ये मुलीला जन्म दिला होता. मुलीचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितीकाची लव्हस्टोरी अतिशय रंजक होतती.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाईल. जर सगळं काही व्यवस्थित असेल तर रोहित या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकतो.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने