Garlic Price Hike : लसणाची फोडणी महागली! प्रति किलोला मोजावे लागतात 'इतके' रुपये

पुणे : अन्नपदार्थांना खमंग, स्वादिष्ट आणि रूचकर चव देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात घट (Decrease Garlic production) झाल्याने पुण्यातील स्थानिक बाजारपेठांमधील आवकही घटली आहे. बाजारात लसणाचा तुटवडा जाणवू लागला असून मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले (Garlic Price Hike) आहेत. किरकोळ बाजारात लसणाचे किलोचे दर ४०० रुपयांवर पोहोचले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले (inflation) असल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब झाल्याचे चित्र आहे.


मार्केट यार्डातील बाजारात रोज ५ ते ७ गाड्यांची आवक होत आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात नवीन लसणाची आवक सुरू होईल. त्यानंतर वाढलेले दर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यापारी समीर रायकर यांनी व्यक्त केला.



देशात लसणाचा तुटवडा जाणवत असतानाच काही प्रमाणात आफगाणिस्तानमधून देशात लसणाची आवक होत आहे. तेथून येणारा लसूण मुंबई, दिल्लीसह दक्षिण भारतातील राज्यात जात आहे. या लसणामुळे काही प्रमाणात दरवाढीला आळा बसला आहे, असेही व्यापार्यांकडून नमूद करण्यात आले. (Garlic Price Hike)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये