Garlic Price Hike : लसणाची फोडणी महागली! प्रति किलोला मोजावे लागतात 'इतके' रुपये

  60

पुणे : अन्नपदार्थांना खमंग, स्वादिष्ट आणि रूचकर चव देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात घट (Decrease Garlic production) झाल्याने पुण्यातील स्थानिक बाजारपेठांमधील आवकही घटली आहे. बाजारात लसणाचा तुटवडा जाणवू लागला असून मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले (Garlic Price Hike) आहेत. किरकोळ बाजारात लसणाचे किलोचे दर ४०० रुपयांवर पोहोचले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले (inflation) असल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब झाल्याचे चित्र आहे.


मार्केट यार्डातील बाजारात रोज ५ ते ७ गाड्यांची आवक होत आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात नवीन लसणाची आवक सुरू होईल. त्यानंतर वाढलेले दर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यापारी समीर रायकर यांनी व्यक्त केला.



देशात लसणाचा तुटवडा जाणवत असतानाच काही प्रमाणात आफगाणिस्तानमधून देशात लसणाची आवक होत आहे. तेथून येणारा लसूण मुंबई, दिल्लीसह दक्षिण भारतातील राज्यात जात आहे. या लसणामुळे काही प्रमाणात दरवाढीला आळा बसला आहे, असेही व्यापार्यांकडून नमूद करण्यात आले. (Garlic Price Hike)

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.