Delhi pollution : वाढत्या प्रदूषणावरून सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले

नवी दिल्ली: दिल्ली सरकारने प्रदूषण(Delhi pollution) रोखण्यासाठी कोणतीही विशेष तयारी केली नाही, सरकारने स्थापन केलेल्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला यासाठी पुरेशी पावले उचलण्यात यश आले नाही, असे म्हणत दिल्ली सरकारसह आयोगालाही सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले.


दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.यापूर्वी फटाके बंदीवरून न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस गंभीर श्रेणीत पोहोचत आहे. गुरुवारी दिल्लीतील काही भागात हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या पुढे गेला.


दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी श्रेणीबद्ध उपाय योजनांचा दुसरा टप्पा लागू करण्यात आल्याचे सांगितले. या टप्प्यात दिलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, यासाठी त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचनाही दिल्या. यापूर्वी १४ ऑक्टोबरला श्रेणीबद्ध उपाययोजनांचा पहिला टप्पा लागू करण्यात आला आहे.


दिल्लीतील विविध भागात प्रदूषण आज, गुरुवारी सकाळी ६ वाजता अत्यंत वाईट श्रेणीतून गंभीर श्रेणीत पोहोचले. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक ५६७ नोंदवला गेला. तर पंजाबी बागेत आणि आनंद विहारमध्ये 465 नोंदवले गेले. राजधानीत थंडीसह दाट धुके आहेत.


प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही ठिकाणी धुररोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडी जाणवत आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहे.


पुढील काही दिवस राजधानीत असेच वातावरण राहणार असल्याने धुके आणि प्रदूषणाचा(Delhi pollution) दुहेरी फटका दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत