Jobs : नोकऱ्यांचे संकट संपणार! २०२८ पर्यंत ३.३९ कोटी रोजगार निर्माण होतील, या क्षेत्रांत आहेत जास्तीत जास्त संधी!

मुंबई : बेरोजगारीने त्रस्त असलेल्या देशातील सर्व तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील नोकरीचे (jobs) हे संकट लवकरच संपुष्टात येईल आणि रोजगाराच्या करोडो संधी तुमच्यासमोर असतील. एका ताज्या अहवालात ही बाब समोर आली आहे.


आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे अनेकांना नोक-या (jobs) गमवाव्या लागतील अशा बातम्या येत असतानाच आता रोजगार निर्मितीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय मोठी भूमिका बजावेल, असे या अहवालात निदर्शनास आले आहे. या अहवालात असे नमूद केले आहे की, AI च्या या युगात, २०२३ ते २०२८ दरम्यान भारतातील कर्मचारी संख्या ४२३.७३ दशलक्ष वरून ४५७.६२ दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे, ५ वर्षांत कामगारांची संख्या ३३.८९ दशलक्ष म्हणजे सुमारे ३.३९ कोटी होईल.



या क्षेत्रांमध्ये तुम्हाला संधी मिळतील


एआई प्लेटफॉर्म फॉर बिजनेस ट्रांसफॉर्मेशन सर्विसनाउ (AI Platform for Business Transformation ServiceNow) ने केलेल्या नवीन संशोधनानुसार, २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष नवीन तंत्रज्ञान-संबंधित नोकऱ्या निर्माण करून नवीन तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये कौशल्यांना नवीन ओळख देईल. जगातील अग्रगण्य कंपनी पीअरसनने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की रिटेल क्षेत्र रोजगार वाढीसाठी पूर्णतः सज्ज आहे. या क्षेत्राच्या विस्तारासाठी ६.९६ दशलक्ष अतिरिक्त कामगारांची गरज आहे. किरकोळ क्षेत्रानंतर उत्पादन क्षेत्रात १.५० दशलक्ष, शिक्षण क्षेत्रात ०.८४ दशलक्ष आणि आरोग्य सेवांमध्ये ०.८० दशलक्ष रोजगार निर्माण होतील.



तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्या वाढतील


सर्व्हिसनाऊ इंडिया टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथूर म्हणाले, 'एआय भारताच्या विकासात, विशेषत: प्रगत तांत्रिक कौशल्यांच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावेल. एआय केवळ व्यावसायिकांसाठी अधिक उच्च-मूल्याच्या संधी निर्माण करेल, परंतु AI त्यांना डिजिटल करिअर तयार करण्यात मदत करेल.'



या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतील


इतर भूमिकांमध्ये सिस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपर (४८,८०० नवीन नोकऱ्या) आणि डेटा अभियंता (४८,५०० नवीन नोकऱ्या) यांचा समावेश होतो. वेब डेव्हलपर, डेटा विश्लेषक आणि सॉफ्टवेअर परीक्षकांसाठी (अनुक्रमे ४८,५००, ४७,८०० आणि ४५,३०० पदांचा अंदाज) नवीन संधी देखील निर्माण केल्या जातील. याशिवाय, अहवालानुसार, डेटा इंटिग्रेशन स्पेशलिस्ट, डेटाबेस आर्किटेक्ट, डेटा सायंटिस्ट आणि कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजर यासारख्या पदांची संख्या ४२,७०० वरून ४३,३०० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ