Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.२७ टक्के मतदान

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत(Jharkhand Assembly Election) बुधवारी पहिल्या टप्प्यात एकूण ४३ जागांवर मतदान झाले. याठिकाणी संध्याकाळपर्यंत सुमारे ६५.२७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एकूण ६८३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.


राज्याच्या शहरी भागातील मतदारांमध्ये यंदाही उदासीनता दिसून आली. रांचीमध्ये सर्वात कमी मतदान झाले, तर जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, हटिया, कानके हजारीबाग येथील मतदारही उदासीन राहिले. याठिकाणी ६० टक्क्यांहून कमी मतदान झाले. मात्र, यावेळी रांचीमध्ये मतदानाचा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे गेला. यंदाच्या निवडणुकीत रांची येथे ५१.५० टक्के मतदान झाले.


कणके वगळता इतर शहरी भागातही मतदानाच्या टक्केवारीत अंशत: सुधारणा झाली. खरसावन येथे सर्वाधिक ७७.३२ टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये पहिल्यांदाच ४३ जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले. काही तुरळक घटना वगळता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले. निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाचे हे मोठे यश मानता येईल.


राज्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर नियोजित वेळेनुसार सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या, जिथे त्यांची वेळेवर दुरुस्ती करण्यात आली किंवा ती बदलून मतदान सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ज्या ४३ जागांवर मतदान झाले. एकूण १५,३४४ मतदान केंद्रांपैकी ९५० मतदान केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत आणि उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.


नियोजित वेळेत रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. कोडरमा, बरकाथा, बार्ही, हजारीबाग, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, माझगाव, रांची, हटिया, पंकी आणि भवनाथपूर येथील १०० टक्के मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.

Comments
Add Comment

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी

Made in India : दोन भारतीय इंजिनिअर्सनी उभी केली १४,१४५ कोटींची 'युनिकॉर्न' कंपनी

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जागतिक स्पर्धेत सध्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, या शर्यतीत आता

Cough Syrups : औषधांच्या नियमात मोठा बदल; कफ सिरपसाठी आता डॉक्टरांची 'चिठ्ठी' बंधनकारक!

नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी