Uddhav Thackeray : निवडणूक अधिका-यांनी उद्धव ठाकरेंना बनवले गि-हाईक!

दुसऱ्यांदा बॅग तपासल्याने ठाकरे सैरभैर झाले; दरवेळी मीच का पहिला म्हणत रडकुंडीला आले

लातूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नेत्यांची बॅग तपासण्याची प्रक्रिया कडकपणे राबवली जात आहे, मात्र यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बॅग दुस-यांदा तपासल्याने ते आक्रमक झाले आहेत.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या ठाकरेंची हेलिपॅडवर बॅग तपासली गेली. त्यावर ठाकरे संतापले आणि मोदी, शिंदे, फडणवीसांचीही बॅग तपासल्याचे व्हिडिओ मागितले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शूट केला व सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर झाला.


Uddhav Thackeray

त्यानंतर, आता औसा मतदारसंघात पुन्हा त्यांच्या बॅगची तपासणी झाली, ज्यामुळे ठाकरे अधिक संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत, आयडी व अपॉईंटमेंट लेटर दाखवण्यास सांगितले. सर्व काही नियमानुसार असल्याने आणि अधिका-यांच्या तपासणीत कुठेच काही नाव ठेवण्यासारखे न सापडल्याने ते अधिकच चिडले.


औसा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले असताना झालेल्या या घटनेवर ठाकरे काकुळतीला येत म्हणाले की, दरवेळेला हे निवडणूक अधिकारी माझीच तपासणी का करतात. मीच का पहिला गिऱ्हाईक? असे सांगत त्यांनी (Uddhav Thackeray) स्वत:चेच हशे करुन घेतले.


Comments
Add Comment

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले