Uddhav Thackeray : निवडणूक अधिका-यांनी उद्धव ठाकरेंना बनवले गि-हाईक!

दुसऱ्यांदा बॅग तपासल्याने ठाकरे सैरभैर झाले; दरवेळी मीच का पहिला म्हणत रडकुंडीला आले

लातूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नेत्यांची बॅग तपासण्याची प्रक्रिया कडकपणे राबवली जात आहे, मात्र यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बॅग दुस-यांदा तपासल्याने ते आक्रमक झाले आहेत.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या ठाकरेंची हेलिपॅडवर बॅग तपासली गेली. त्यावर ठाकरे संतापले आणि मोदी, शिंदे, फडणवीसांचीही बॅग तपासल्याचे व्हिडिओ मागितले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शूट केला व सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर झाला.


Uddhav Thackeray

त्यानंतर, आता औसा मतदारसंघात पुन्हा त्यांच्या बॅगची तपासणी झाली, ज्यामुळे ठाकरे अधिक संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत, आयडी व अपॉईंटमेंट लेटर दाखवण्यास सांगितले. सर्व काही नियमानुसार असल्याने आणि अधिका-यांच्या तपासणीत कुठेच काही नाव ठेवण्यासारखे न सापडल्याने ते अधिकच चिडले.


औसा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले असताना झालेल्या या घटनेवर ठाकरे काकुळतीला येत म्हणाले की, दरवेळेला हे निवडणूक अधिकारी माझीच तपासणी का करतात. मीच का पहिला गिऱ्हाईक? असे सांगत त्यांनी (Uddhav Thackeray) स्वत:चेच हशे करुन घेतले.


Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक