Wednesday, August 13, 2025

भारताविरुद्ध विजय मिळवताना आफ्रिकेची दमछाक, मालिकेत गाठली बरोबरी

भारताविरुद्ध विजय मिळवताना आफ्रिकेची दमछाक, मालिकेत गाठली बरोबरी
मुंबई: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. भारताने विजयासाठी छोटेसे आव्हान दिले होते. मात्र तेही पूर्ण करता करता आफ्रिकेच्या नाकीनऊ आले.

भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी १२५ धावा हव्या होत्या. अखेरीस शेवट्च्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेला हा विजय मिळवून दिला आणि बरोबरी गाठून दिली.

चार सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि दक्षिण आफ्रिका १-१ अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टर्ब्सने सर्वाधिक नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा