ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने हरवणार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

मुंबई: भारताला नुकताच मायदेशात न्यूझीलंडकडून ३-० असा व्हाईटवॉश सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याबाबत भविष्यवाणी केली आहे.


ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका ३-१ने जिंकेल असे. या मालिकेत भारताला केवळ एकच सामना जिंकता येईल. अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगने केली आहे. कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. याआधी सुनील गावस्कर यांनीही भारत ही मालिका ४-० अशी जिंकणे शक्य नसल्याचे म्हटले होते.


एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंगने हे वक्तव्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शमी दुखापतीमुळे क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या जलद गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते.


यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कौतुकही केले. पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ स्थिर आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत कमकुवत वाटत नाही. माझ्या मते भारत एक सामना जिंकेल.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या