ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने हरवणार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

मुंबई: भारताला नुकताच मायदेशात न्यूझीलंडकडून ३-० असा व्हाईटवॉश सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याबाबत भविष्यवाणी केली आहे.


ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका ३-१ने जिंकेल असे. या मालिकेत भारताला केवळ एकच सामना जिंकता येईल. अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगने केली आहे. कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. याआधी सुनील गावस्कर यांनीही भारत ही मालिका ४-० अशी जिंकणे शक्य नसल्याचे म्हटले होते.


एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंगने हे वक्तव्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शमी दुखापतीमुळे क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या जलद गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते.


यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कौतुकही केले. पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ स्थिर आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत कमकुवत वाटत नाही. माझ्या मते भारत एक सामना जिंकेल.

Comments
Add Comment

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली.

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला