ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने हरवणार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

  65

मुंबई: भारताला नुकताच मायदेशात न्यूझीलंडकडून ३-० असा व्हाईटवॉश सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याबाबत भविष्यवाणी केली आहे.


ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका ३-१ने जिंकेल असे. या मालिकेत भारताला केवळ एकच सामना जिंकता येईल. अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगने केली आहे. कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. याआधी सुनील गावस्कर यांनीही भारत ही मालिका ४-० अशी जिंकणे शक्य नसल्याचे म्हटले होते.


एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंगने हे वक्तव्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शमी दुखापतीमुळे क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या जलद गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते.


यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कौतुकही केले. पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ स्थिर आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत कमकुवत वाटत नाही. माझ्या मते भारत एक सामना जिंकेल.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी