ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने हरवणार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

  47

मुंबई: भारताला नुकताच मायदेशात न्यूझीलंडकडून ३-० असा व्हाईटवॉश सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याबाबत भविष्यवाणी केली आहे.


ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका ३-१ने जिंकेल असे. या मालिकेत भारताला केवळ एकच सामना जिंकता येईल. अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगने केली आहे. कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. याआधी सुनील गावस्कर यांनीही भारत ही मालिका ४-० अशी जिंकणे शक्य नसल्याचे म्हटले होते.


एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंगने हे वक्तव्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शमी दुखापतीमुळे क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या जलद गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते.


यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कौतुकही केले. पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ स्थिर आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत कमकुवत वाटत नाही. माझ्या मते भारत एक सामना जिंकेल.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार