
सूरज ठाकूर यांनी छायांकन, मनोज व्ही यांनी संकलन, अभिषेक कदम यांनी ध्वनि आरेखनाची जबाबदारी निभावली आहे. चिदानंद एफटीआयआयमध्ये शिकत असताना लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपट महोत्सवांच्या वर्तुळात या लघुपटाचा गौरव झाला आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात या लघुपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर आता हा लघुपट ऑस्कर पुरस्कारांमध्ये जागतिक स्तरावरील लघुपटांशी स्पर्धा करणार आहे. ऑस्करमध्ये दावेदारी करताना लघुपटाचे खेळ, पत्रकार परिषदा, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हा लघुपट ॲकॅडमीचे अधिकाधिक प्रतिनिधी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.