Nitesh Rane : रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का? नीतेश राणेंचे विरोधकांवर शरसंधान

  115

मुंबई : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावाही राऊत यांनी केला. तसेच शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. यावर भाजपाचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का? त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, असे शरसंधान राणे यांनी राऊतांवर साधले.


निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल आणि लोकशाही पद्धतीने काम करत असाल, तर घाबरता कशाला? कर नाही तर डर कशाला? रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर एवढा विरोध का? असा सवाल नीतेश राणे यांनी केला. रश्मी शुक्ला यांच्या नावामुळे राऊतांची झोप उडाली आहे. कुठेही वसुली करायला आणि भ्रष्टाचार करायला राज्याच्या डीजी रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का? संजय राऊत यांच्या मनातले काळबेरं बाहेर आले आहे. रश्मी शुक्ला या कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. त्या कोणाच्याही बाजूने पक्षपाती काम करत नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप असत्य आहेत आणि त्यांना हटवण्याची मागणी अनावश्यक आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी