Share

राजश्री वटे

जाता जाता पावसाने पुन्हा एकदा वळून पाहिले…जसे डोळ्यांतून त्याच्या अश्रू वाहत होते…धरणी मातेचा पदर भिजवून आकाशाकडे परत निघाला आहे…हिरवीगार झालेली झाडे बघून तो आनंदात होता की… जायचं आहे त्याचं दुःख होतं…
वाटलं… ते पावसाचे थेंब काही सांगू पाहत आहे जणू… एकवार गळाभेट करून बघू या… आत साचलेला पाऊस आपोआप बाहेर येईल…मनावरचे ओझे उतरून जाईल… मन तरंग तरंग होऊन जाईल…कोणाला कळणार ही नाही पाणी डोळ्यांतून वाहतं आहे की पावसाच्या डोळ्यांतून!! डोळ्यांतील अश्रू केव्हाही झरतात… नकळत…ना हम जाने…ना तुम!! का कोणास ठाऊक…कधी कधी मन आतून खूप भरले आहे आभाळासारखे… डोळे पाणावलेले भासतात… असे वाटते केव्हा बरसतील अवेळी पावसासारखे… काही कारण लागत नाही वहायला…फक्त… दुःखातच नव्हे… थोडसे सुख जवळ आले तरी डोळ्यांचे पाझरणे नाही थांबवू शकत… कसे सांगावे… कुठेही… काही कारण नसताना… हे बेबंद होऊन जातात… काळे ढग जमून येतात तेेव्हा मनाची चलबिचल होऊन डोळ्यांतला पाऊस बरसायला लागतो… कुठलं कुठलं काहीसं आठवायला लागतं! सूर्याचे उगवते रूप असो… मावळती संध्याकाळ असो… काहीसे जुने आठवते व नकळत श्वास ओलसर होत जातो… एकटे असताना देखील कधी… रात्रीच्या वेळी आकाशाकडे नजर गेलीच तर… तारकांची सजलेली मैफल नजरेस पडते… बस, ये जश्न जो देखा तो… हळव्या मनाचे व्यक्त होणे डोळ्यांतून तरंगणाऱ्या पाण्यातून दिसते… कधी समजतच नाही… या मनाला कसे आवरावे!!

सागरकिनारी लाटांसमवेत गुजगोष्टी कराव्यात तेव्हा मनात आपोआप गुणगुणायला लागते एक चिंब भिजलेली गझल!
मनाला भिजायला काहीही कारण लागतं… कोणाच्या प्रेमळ बोलण्याने… कुणाचे दुःख ऐकल्याने… एखादे गम भरे गीत ऐकल्याने सुद्धा… गळा भरून येतो… भक्तिरसातले गीत देखील निमित्त ठरते मनाच्या पावसाला! अगदी तिरंगा पाहाताच देखील गळा दाटून येतो…सगळे आठवून डोळे भरून येतात… शब्द दाटतात… हरवून जातात… कोणास ठाऊक कां… कित्येकदा अश्रूंना सांगून बघितले… वाहण्या आधी माझी परवानगी घ्यायला विसरत जाऊ नकोस… मला एकट्याला भेटत जा… पण नाही… ऐकेल ते अश्रू कसले… बरसतात… वाहतात… डोळ्यांमधल्या खोल डोहात खळबळ माजवून जातात…कोणी आसू पुसेल म्हणून वाट पाहतात…पुसणारे कोणी असेल तर वाहण्यास अर्थ आहे… नाहीतर ते वाहणे सुद्धा व्यर्थ आहे! असे हे आतल्या व बाहेरच्या पावसाचे अतूट नाते… थांबता थांबता पुन्हा वाहते!! हा परतीचा पाऊस केव्हा बरसेल… कोणास ठाऊक?

Recent Posts

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

14 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

24 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

44 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

59 minutes ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago

वेळेचे महत्त्व!

रमेश तांबे नेहमीच्या सवयीप्रमाणे मुग्धा जरा उशिराच उठली. तिला हाक मारून मारून आई थकून गेली…

1 hour ago