नवी दिल्ली : पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध (PAK vs ENG) पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर मात्र अफलातून पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. रावळपिंडी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने तिसऱ्याच दिवशी ९ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान पाकिस्तानने २०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडला पाकिस्तानसमोर अवघे ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले होते. हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत ४ चौकार आणि एक षटकारासह ६ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तसेच सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली, तर अब्दुल्ला शफिकने ५ धावा केल्या.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ६८.२ षटकात सर्वबाद २६७ धावा केल्या. इंग्लंडकडून जॅमी स्मिथने सर्वाधिक ८९ धावा केल्या, तर बेन डकेटने ५२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर गस ऍटकिन्सनने ३९ धावांची खेळी केली. पण बाकीच्यांना खास काही करता आले नाही. पाकिस्तानकडून या डावात साजिद खानने ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नोमन अलीने ३ विकेट्स घेतल्या, तर झाहिद महमुदने १ विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्तानकडून सौद शकिलने १३४ धावांची शतकी खेळी केली. पण नंतर फलंदाजी कोलमडली होती. परंतु नोमन अली आणि साजिद खान यांनी नंतर केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानने ९६.४ षटकात ३४४ धावा केल्या आणि ७७ धावांची आघाडी घेतली. नोमन अलीने ४५ आणि साजिदने ४८ धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून रेहान अहमदने ४ विकेट्स घेतल्या, तर शोएब बाशीरने ३ विकेट्स घेतल्या. गस ऍटकिन्सनने २ आणि जॅक लीचने १ विकेट घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी फक्त ११२ धावांवर उरकला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडचे फलंदाज फार काही करू शकले नाहीत. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ३३ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही २० धावाही पार करता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून नोमन अलीने ६ विकेट्स घेतल्या, तर साजिद खानने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, इंग्लंड ११२ धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांना पाकिस्तानसमोर ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…