PAK vs ENG : पाकिस्तानचा इंग्लंडवर नऊ विकेटसने दणदणीत विजय!

मालिकेत २-१ ने विजय, मायदेशी तीन वर्षांनंतर जिंकली मालिका


नवी दिल्ली : पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध (PAK vs ENG) पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर मात्र अफलातून पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. रावळपिंडी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने तिसऱ्याच दिवशी ९ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान पाकिस्तानने २०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडला पाकिस्तानसमोर अवघे ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले होते. हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत ४ चौकार आणि एक षटकारासह ६ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तसेच सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली, तर अब्दुल्ला शफिकने ५ धावा केल्या.


या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ६८.२ षटकात सर्वबाद २६७ धावा केल्या. इंग्लंडकडून जॅमी स्मिथने सर्वाधिक ८९ धावा केल्या, तर बेन डकेटने ५२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर गस ऍटकिन्सनने ३९ धावांची खेळी केली. पण बाकीच्यांना खास काही करता आले नाही. पाकिस्तानकडून या डावात साजिद खानने ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नोमन अलीने ३ विकेट्स घेतल्या, तर झाहिद महमुदने १ विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्तानकडून सौद शकिलने १३४ धावांची शतकी खेळी केली. पण नंतर फलंदाजी कोलमडली होती. परंतु नोमन अली आणि साजिद खान यांनी नंतर केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानने ९६.४ षटकात ३४४ धावा केल्या आणि ७७ धावांची आघाडी घेतली. नोमन अलीने ४५ आणि साजिदने ४८ धावांची खेळी केली.



इंग्लंडचा डाव ११२ धावांवर गडगडला


इंग्लंडकडून रेहान अहमदने ४ विकेट्स घेतल्या, तर शोएब बाशीरने ३ विकेट्स घेतल्या. गस ऍटकिन्सनने २ आणि जॅक लीचने १ विकेट घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी फक्त ११२ धावांवर उरकला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडचे फलंदाज फार काही करू शकले नाहीत. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ३३ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही २० धावाही पार करता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून नोमन अलीने ६ विकेट्स घेतल्या, तर साजिद खानने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, इंग्लंड ११२ धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांना पाकिस्तानसमोर ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव