Devendra Fadnavis : आधी 'वर्षा' मग 'मातोश्री' आता 'सागर' बंगल्यावर पोहचले अनंत अंबानी; फडणवीसांच्या घरी, मध्यरात्री बारा वाजता नक्की काय झाली बंद दाराआड चर्चा?

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक मित्रपक्षाच्या गाठीभेटी सुरु आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंत अंबानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाचे उधाण पसरले आहे.


मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यावेळी नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाल्या ये अद्यापही स्पष्ट झाले नाही.



अंबानी कुटुंबाच्या आधीही झाल्या राजकीय भेटी


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला तेजस ठाकरेही उपस्थित होते.


त्याचबरोबर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळीही तासभर त्यांची चर्चा सुरु होती.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास