Devendra Fadnavis : आधी 'वर्षा' मग 'मातोश्री' आता 'सागर' बंगल्यावर पोहचले अनंत अंबानी; फडणवीसांच्या घरी, मध्यरात्री बारा वाजता नक्की काय झाली बंद दाराआड चर्चा?

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक मित्रपक्षाच्या गाठीभेटी सुरु आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंत अंबानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाचे उधाण पसरले आहे.


मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यावेळी नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाल्या ये अद्यापही स्पष्ट झाले नाही.



अंबानी कुटुंबाच्या आधीही झाल्या राजकीय भेटी


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला तेजस ठाकरेही उपस्थित होते.


त्याचबरोबर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळीही तासभर त्यांची चर्चा सुरु होती.

Comments
Add Comment

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे