Devendra Fadnavis : आधी 'वर्षा' मग 'मातोश्री' आता 'सागर' बंगल्यावर पोहचले अनंत अंबानी; फडणवीसांच्या घरी, मध्यरात्री बारा वाजता नक्की काय झाली बंद दाराआड चर्चा?

  255

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक मित्रपक्षाच्या गाठीभेटी सुरु आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंत अंबानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाचे उधाण पसरले आहे.


मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यावेळी नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाल्या ये अद्यापही स्पष्ट झाले नाही.



अंबानी कुटुंबाच्या आधीही झाल्या राजकीय भेटी


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला तेजस ठाकरेही उपस्थित होते.


त्याचबरोबर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळीही तासभर त्यांची चर्चा सुरु होती.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस