राज ठाकरे यांनी केले गाडीचे सारस्थ्य

कल्याण (प्रतिनिधी) :कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण आमदार म्हणून निवडून आलो होतो. त्याच दिवशी आपण आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरताना अनोखा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने हा दिवस आपल्यासाठी लकी असल्याची भावना राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार आज राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही, तर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना गाडीमध्ये बसवत राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या गाडीचे सारस्थ्य केले.


२०१९ मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आपण आमदार झालो होतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी आहे. राज ठाकरे पहिल्यांदा आपल्या आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः आले. आमच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असून आम्ही अत्यंत आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजू पाटील यांच्या समर्थकांनी मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment

रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण? - इच्छुकांची रांग; बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची, तर उबाठा आणि मनसेसाठी अस्तित्वाची लढत मानली जात

पुण्यात नाही होणार मनसे - काँग्रेस आघाडी

पुणे : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (उबाठा गट), शिवसेना (राज

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांना फोन जाण्यास सुरुवात - काही ठिकाणी जागांची अदलाबदली; बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून विशेष खबरदारी

मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने, महायुतीच्या नेत्यांनी मुंबईसाठी नावे अंतिम झालेल्या

खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय ; याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी (SIT) स्थापन करावी - सुनिल तटकरे

मुंबई : खोपोलीतजी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय

योगी आदित्यनाथ, नितेश राणेंसह हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी

मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार; विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार मुंबई : राज्यातील २९