कोकणात एकही जागा न देता उबाठाने काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली!

कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत. ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठाच्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत. ते काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणामधून तर उबाठाने काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.


आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटत आहेत. त्यातल्या किती जागा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे जाहीर करावे. आज काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भुईसपाट केले आहे, संपवून टाकले आहे. याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही, असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सागरी विकासाच्या बळावर महाराष्ट्र देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार; मंत्री नितेश राणे

- अदानींचा 'फेज-२' प्रकल्प महाराष्ट्रात येणार, 'मरीन सेक्टर' गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या पुढे नेणार मुंबई (सुहास

Parth Pawar : मुंढवा जमीन वादात न्यायालयाचा मोठा आदेश; पार्थ पवारांच्या कंपनीचा दस्त रद्द

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Ind vs Eng : लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये ऐतिहासिक कसोटी सामना

लंडन: क्रिकेटचे सर्वात प्रतिष्ठित मैदान असलेल्या लॉर्ड्सवर शुक्रवारी पहिला महिला कसोटी सामना खेळला जाणार असून,