Mobile recharge: वर्षभराचा सर्वात स्वस्त प्लान, २७६ रूपयांत ९१२ जीबी डेटा, Unlimited 5G

मुंबई: जर तुम्ही प्रीपेड मोबाईल युजर्स(mobile users) असाल तर दर महिन्याला फोनचा रिचार्ज करण्याचे टेन्शन असते. दर महिन्याला रिचार्ज करणे आणि त्यातच रिचार्ज प्लान महाग झाल्यास खिशावर आणखी बोजा पडतो. अशातच आम्ही तुम्हाला भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ(jio), एअरटेल(airtel) आणि व्होडाफोन-आयडिया(vodafone-idea) यांचे असे काही प्लान्स सांगत आहोत जे एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर टेन्शन राहणार नाही.


इतकंच नव्हे तर हे प्लान महिन्याच्या प्लान्सपेक्षा अधिक स्वस्त पडतात. याशिवाय जर एका वर्षात कधीही प्लान्स महागले तर तुमच्या खिशावर तितका परिणाम होत नाही.



Reliance Jioचा वार्षिक प्लान


जिओचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान ३५९९ रूपयांचा आहे. याची व्हॅलिडिटी संपूर्ण ३६५ दिवसांची असते. या प्लानमध्ये युजर्सला २.५ जीबी डेटा मिळतो. याचा अर्थ या प्लानसोबत युजर्सला एकूण ९१२.५० जीबी डेटा मिळतो. या प्लानसोबत युजर्स अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. सोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय युजर्सला Jio True5G म्हणजेच अनलिमिटेड ५ जी डेटाचा वापर करू शकतात.



Bharti Airtel चा वार्षिक प्लान


एअरटेलचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान १९९९ रूपयांचा आहे. हा जिओच्या वार्षिक प्लानच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. याची व्हॅलिडिटीही ३६५ दिवसांची आहे. यात एकूण मिळून २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात Airtel Xtream, Spam Fighting Network, Apollo 24*7 Circle, Wynk Music चेही फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Viचा वार्षिक प्लान


व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान ३४९९ रूपयांचा आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपू्र्ण ३६५ दिवसांची आहे. या प्लानसोबत युजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला Binge All Night आणि वीकेंड डेटा रोलओव्हरचीही सुविधा मिळते.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल