India China Relations : भारत- चीन करार; मात्र चीनच्या कुरघोड्या थांबतील?

भारत-चीनमधील सीमावाद संपुष्टात! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार


भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. मात्र, हा वाद आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी भारत आणि चीनने नवीन करार केला आहे. हा करार डेमचोक आणि डेपसांग भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. आज परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी २२-२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या १६ व्या ब्रिक्स परिषदेसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, 'भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. आमचा चीनशी एलएसी मुद्द्यांवर करार आहे. परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि सैन्य मागे घेण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर काम करत आहोत.'


भारत आणि चीनमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, 'दोन्ही देशांमधील गस्तीबाबतच्या करारानंतर एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी सुरू पर्कात आहे.




२०२० पासून वाढला वाद


भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५-१६ जून २०२० रोजी चकमक झाली होती. २० भारतीय जवान शहीद झाले, तर चीनी सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट आहे. चीनमधल्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे जवळपास दिसत आहेत.


Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे