India China Relations : भारत- चीन करार; मात्र चीनच्या कुरघोड्या थांबतील?

भारत-चीनमधील सीमावाद संपुष्टात! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार


भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. मात्र, हा वाद आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी भारत आणि चीनने नवीन करार केला आहे. हा करार डेमचोक आणि डेपसांग भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. आज परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी २२-२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या १६ व्या ब्रिक्स परिषदेसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, 'भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. आमचा चीनशी एलएसी मुद्द्यांवर करार आहे. परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि सैन्य मागे घेण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर काम करत आहोत.'


भारत आणि चीनमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, 'दोन्ही देशांमधील गस्तीबाबतच्या करारानंतर एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी सुरू पर्कात आहे.




२०२० पासून वाढला वाद


भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५-१६ जून २०२० रोजी चकमक झाली होती. २० भारतीय जवान शहीद झाले, तर चीनी सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट आहे. चीनमधल्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे जवळपास दिसत आहेत.


Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार