IND Vs NZ: न्यूझीलंडसमोर केवळ १०७ धावांचे आव्हान, पाऊस येणार टीम इंडियासाठी धावून?

  72

बंगळुरू: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या के.एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. म्हणजेच न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान मिळाले आहे.


धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे खातेही उघडलेले नाही. म्हणजेच न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावा हव्या असून त्यांचे १० विकेट बाकी आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉन्वे नाबाद होते.



भारताची सामन्यावरील पकड ढिली, आता चाहत्यांना पावसाची प्रतीक्षा


आज या सामन्याचा पाचवा दिवस असेल. सध्या भारतीय संघ ज्या स्थितीत आहे अशातच त्यांची सामन्यावरील पकड ढिली झाली आहे. जर भारतीय संघाने २००च्या जवळपास आव्हान दिले असते तर न्यूझीलंडच्या संघावर दबाव असता. मात्र आता न्यूझीलंडला केवळ लहान लक्ष्य पार करायचे आहे. एकूण मिळून भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे कठीण दिसत आहे.


अशातच भारतीय चाहते आता प्रतीक्षा करत आहेत की पावसाने तरी कृपा करावी. ज्यामुळे सामना अनिर्णीत राहील. खेळाचा पहिला दिवस पावसाने वाया गेला होता. आता बंगळुरू कसोटीच्या पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. या दिवशी ८० टक्के पावसाची शक्यता आहे. सकाळी ९ आणि १० वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आहे. तर पुढील दोन तासांत ४७ आणि ४५ टक्के पावसाची शक्यता आहे

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार