भाषा हरवण्याची गोष्ट

मायभाषा - डॉ. वीणा सानेकर


माझा निधीशी फारसा परिचय नव्हता पण त्यादिवशी तिने मला मुलांसाठी उपयुक्त मराठी पुस्तकांची नावे विचारली नि मनापासून बोलू लागली. ‘‘माझ्या एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला पत्र लिहून चकित करायचे ठरवले नि चक्क लिहायला घेतले. मोबाईल आल्यापासून पत्र वगैरे विसरायलाच झाले आहे. आता खूप दिवसांनी लिहायला बसले आणि मनासारखे शब्दच आठवेनात. जणू माझी भाषाच आटली आहे असे वाटले नि भीतीच वाटली. मराठी माध्यमात शिकलेल्या माझे असे होऊ शकते तर माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या नि आमच्या त्रिकोणी कुटुंबात वाढणाऱ्या मुलांच्या मराठीचे काय होणार?’’


तिच्या संवादातलेे ‘जणू माझी भाषाच आटली आहे, असेे वाटले.’ हे वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवत राहिले. आपली भाषा आटून जाणे म्हणजे काय? शब्दच न सुचणेे, व्यक्त होता न येणे, मनात खूप काही दाटून येणे नि हे सारे शब्दबद्ध न करता येणे. हे जाणवण्याइतकी संंवेदनशीलता प्रत्येकात असतेेच असे नाही. कारण दैनंदिन चाकोरीत भाषेचा इतका विचार करणेच सुचत नाही.
निधीला ते जाणवते आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. तिच्या बोलण्यातला आणखी एक शब्द मला महत्त्वाचा वाटला. तो म्हणजे, ‘त्रिकोणी कुटुंबात वाढणारा मुलगा.’ आजी-आजोबांकडून होणाऱ्या संस्कारांपासून त्रिकोणी कुटुंबातील मुले वंंचित राहतात. या संस्कारांंमध्ये ‘भाषा’ हा भाग प्रमुख असतो. गोष्टी, गाणी यांंच्यातून भाषा हे मूल्य आजी- आजोबांकडून नकळतपणे मुलांच्या मनावर ठसवले जाते.


मुलांकडे खरे तर अनेक भाषा शिकण्याची क्षमता असतेे. पण अलीकडेेे दिसणारे चित्र हे की, इंंग्रजी माध्यमात शिकणारी मुले इंग्रजी किंवा फार तर एका विदेशी भाषेशी जोडलेली राहतात, पण मातृभाषेसकट अन्य प्रादेशिक भाषांपासूून मुले दूर जातात किंवा त्यांना दूर ठेवले जाते. असे घडल्याने मुलांंचा कोणता तोटा होतो? मुलांच्या भावनिक विकासात त्यामुळे काही कोऱ्या जागा राहून जातात.
पालकांंचा कल मुलांंच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकडे असतो पण मुलांचा भावनिक विकासही समांंतरपणे तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या भाषेतील साहित्य मुलांंच्या मनाचे भरणपोषण करतेे. यातून त्यांंची संवेदनशीलता आपसुुक घडत जाते. भगवत रावत या हिंदी कवीची कविता आठवते आहेे. मुलाला आपल्या भाषेेपासून लहानपणापासून दूर ठेवलेे नि तो विदेशात जायला निघताना जाणवलेे की, सोबत द्यायला भाषाच नाही. रावत यांच्या कवितेतील हा निवडक अंश


“जवळ नव्हता एकही असा शब्द
जो देऊन म्हणू शकलो असतो…
घ्या. याला सांंभाळून ठेवा. हा संकटकाळी कामी येईल.
किंवा हा तुम्हाला
पडण्यापासून सावरेल
किंवा तुम्ही याच्या आधारेे कोणत्याही नीचपणाचा सामना करू शकाल.
किंवा इतकेच की, कधी कधी तुम्ही याने आपले रितेपण भरू शकाल
पण काहीच नव्हते माझ्यापाशी
‘काहीच नाहीय’ हे सांंगायलाही
भाषा नव्हती.’’

Comments
Add Comment

स्पर्शाची दुनिया सारी

माेरपीस : पूजा काळे स्पर्श म्हणजे जाणीव जागृतींचा काही वेळेसाठी घडलेला सहवास. कळत नकळत होणारा हाताचा हाताशी

आवाज हरपण्याचे दिवस संपले

डॉ. कणव कुमार भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी),

संघर्षातून नेतृत्वाकडे नौरोती देवीची प्रेरणादायी कहाणी

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे “जीवनातील कठीण परिस्थितीतूनच खरे नायक घडतात,” असे म्हटले जाते. राजस्थानच्या ग्रामीण

नकोशा होताहेत हव्याशा

पुरुष आणि महिला ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. एका वाहनाला सुरळीत चालण्यासाठी फक्त दोन चाकेच आवश्यक नसतात,

गोड बोलण्याचे सामर्थ्य

निशा वर्तक तीळगूळ घ्या, गोड बोला’ ही केवळ एक म्हण नाही; तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, जीवनाला दिलेला एक प्रेमळ

कुंकवाचं लेणं

माेरपीस : पूजा काळे लग्नसराईत नटण्याची हळदीला कोण घाई कुंकुमतिलकाने सौभाग्य वाणाची लयलूट होई. कुमारिका,