बाबा सिद्दीकी हत्येसाठी डोंबिवलीतील गँगला दिली होती सुपारी

 आतापर्यंत नऊ जण ताब्यात


मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येचं प्रकरण तपासात नवनवे खुलासे उघड होत आहेत. १२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी तपासात आणखी एका धक्कादायक कनेक्शनचा उलगडा झाला आहे.


डोंबिवलीतील नितीन सप्रे गँगलाही सुरुवातीला सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. शुभम लोणकर या व्यक्तीने सप्रे गँगशी संपर्क साधून गोळीबारासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र सप्रे गँगची मागणी जास्त असल्याने, नंतर बिश्नोई गँगच्या धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या शूटर्सनाच काम देण्यात आले.


आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात पनवेल, कर्जत, आणि डोंबिवलीतील व्यक्तींचाही समावेश आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस तपासाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक