बाबा सिद्दीकी हत्येसाठी डोंबिवलीतील गँगला दिली होती सुपारी

 आतापर्यंत नऊ जण ताब्यात


मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येचं प्रकरण तपासात नवनवे खुलासे उघड होत आहेत. १२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी तपासात आणखी एका धक्कादायक कनेक्शनचा उलगडा झाला आहे.


डोंबिवलीतील नितीन सप्रे गँगलाही सुरुवातीला सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. शुभम लोणकर या व्यक्तीने सप्रे गँगशी संपर्क साधून गोळीबारासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र सप्रे गँगची मागणी जास्त असल्याने, नंतर बिश्नोई गँगच्या धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या शूटर्सनाच काम देण्यात आले.


आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात पनवेल, कर्जत, आणि डोंबिवलीतील व्यक्तींचाही समावेश आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस तपासाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी