बाबा सिद्दीकी हत्येसाठी डोंबिवलीतील गँगला दिली होती सुपारी

 आतापर्यंत नऊ जण ताब्यात


मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येचं प्रकरण तपासात नवनवे खुलासे उघड होत आहेत. १२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी तपासात आणखी एका धक्कादायक कनेक्शनचा उलगडा झाला आहे.


डोंबिवलीतील नितीन सप्रे गँगलाही सुरुवातीला सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. शुभम लोणकर या व्यक्तीने सप्रे गँगशी संपर्क साधून गोळीबारासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र सप्रे गँगची मागणी जास्त असल्याने, नंतर बिश्नोई गँगच्या धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या शूटर्सनाच काम देण्यात आले.


आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात पनवेल, कर्जत, आणि डोंबिवलीतील व्यक्तींचाही समावेश आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस तपासाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री