निवडणूक लढविण्याबाबत परवा अंतिम निर्णय घेणार: मनोज जरांगे

जालना(प्रतिनिधी): अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही ठरलेले नाही. शेवटी निर्णय २० तारखेला मराठा समाजासमोर होणार आहे. इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने यावर चर्चा झाली, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषेदत सांगितले.

जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मकता दर्शवली.
Comments
Add Comment

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या