निवडणूक लढविण्याबाबत परवा अंतिम निर्णय घेणार: मनोज जरांगे

जालना(प्रतिनिधी): अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही ठरलेले नाही. शेवटी निर्णय २० तारखेला मराठा समाजासमोर होणार आहे. इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने यावर चर्चा झाली, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषेदत सांगितले.

जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मकता दर्शवली.
Comments
Add Comment

Shankar Anna Dhondge: शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हजारो समर्थकांसह शिवसेनेत दाखल

मुंबई : लोहा-कंधारचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह

मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए ?

ठाणे : ठाणे महापालिकेत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. ठामपामध्ये ३३ प्रभाग आणि १३१ जागा आहेत. यातील ७५ जागांवर

अजितदादांच्या निधनाचा शोक की संधी? प्रशासकीय दुखवट्यात ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा प्रताप; मकोका अंतर्गत कारवाईची मागणी मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे शरसंधान स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना

महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपचा पहिला घाव

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र मुंबई:

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक