निवडणूक लढविण्याबाबत परवा अंतिम निर्णय घेणार: मनोज जरांगे

जालना(प्रतिनिधी): अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही ठरलेले नाही. शेवटी निर्णय २० तारखेला मराठा समाजासमोर होणार आहे. इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने यावर चर्चा झाली, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषेदत सांगितले.

जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मकता दर्शवली.
Comments
Add Comment

'केवळ जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा'

आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंता मुंबई : महाराष्ट्राचा

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधानपरिषदेत घोषणा - महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा

'संजय राऊत, उबाठा गट षंढाच्या भूमिकेत'; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : संजय राऊत, उबाठा गट हे षंढाच्या भूमिकेत वावरत आहेत. राऊत हे षंढ असून त्यांना, शांततेचा अधिकार षंढांना नसतो

सोशल मीडियावरील 'चारित्र्यहनन' रोखण्यासाठी विशेष समिती

- मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; नवा कायदा करण्याचे दिले संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि