निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव बंधनकारक

अलिबाग (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १२७-क नुसार कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे, अन्यथा कोणतेही पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.


निवडणुकीसाठी असणारी पत्रके,छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.


निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी, अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुदतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा आहे. या निर्बंधाचे व्यतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल. उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सुचनांची नोंद घ्यावी, असेही जावळे यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

'केवळ जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा'

आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंता मुंबई : महाराष्ट्राचा

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधानपरिषदेत घोषणा - महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा

'संजय राऊत, उबाठा गट षंढाच्या भूमिकेत'; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : संजय राऊत, उबाठा गट हे षंढाच्या भूमिकेत वावरत आहेत. राऊत हे षंढ असून त्यांना, शांततेचा अधिकार षंढांना नसतो

सोशल मीडियावरील 'चारित्र्यहनन' रोखण्यासाठी विशेष समिती

- मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; नवा कायदा करण्याचे दिले संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून