निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव बंधनकारक

अलिबाग (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १२७-क नुसार कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे, अन्यथा कोणतेही पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.


निवडणुकीसाठी असणारी पत्रके,छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.


निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी, अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुदतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा आहे. या निर्बंधाचे व्यतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल. उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सुचनांची नोंद घ्यावी, असेही जावळे यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची पुढील 'सर्वोच्च' सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय

फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या GR ला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, मराठ्यांना दिलासा

मुंबई : ठोस पुरावे सादर केल्यास त्यांची छाननी करुन खात्री पटल्यानंतर संबंधित मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे

मनसे वरुन मविआत वादावादी

मुंबई : महाराष्ट्रातल्या युतीत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कायम मान मिळाला. पण त्यांचेच पुत्र असलेल्या

'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'

मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी अनिल परब यांनी धमकावले,

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ