बदलापूरमधील मनसेची 'ती रणरागिणी' आता निवडणूक लढविणार

बदलापूर : बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केल्यानंतर आता त्यांना मनसे मधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.बदलापूर शहरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांसह मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी यात पुढाकार घेतल्याने उशिरा का हाईना गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शहरात नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. याचेही नेतृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते.
Comments
Add Comment

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी