मुंबई : यंदाच्या पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत. मात्र तरीही मुंबईकरांना (Mumbai) पाणी कपातीचा (Watershortage) सामना करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. महापालिकेने दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले असून त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबई जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणीपुरवठ्यात घट झाली असल्याने पुढील दोन दिवस मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५ ते १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…