Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

  45

सोलापूर : वरण किंवा कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असते. जेवणात लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लसणाची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील महिनाभरात लसणाची आवक घटल्याने १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण तब्बल ३५० रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर लसणाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही काही दिवस सर्वसामान्यांना लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तर खराब हवामानामुळेही अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान आणि ग्राहकांची मागणी पाहता आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.


दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवडमुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड होत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या