Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

सोलापूर : वरण किंवा कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असते. जेवणात लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लसणाची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील महिनाभरात लसणाची आवक घटल्याने १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण तब्बल ३५० रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर लसणाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही काही दिवस सर्वसामान्यांना लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तर खराब हवामानामुळेही अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान आणि ग्राहकांची मागणी पाहता आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.


दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवडमुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड होत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई