Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

सोलापूर : वरण किंवा कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असते. जेवणात लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लसणाची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील महिनाभरात लसणाची आवक घटल्याने १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण तब्बल ३५० रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर लसणाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही काही दिवस सर्वसामान्यांना लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तर खराब हवामानामुळेही अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान आणि ग्राहकांची मागणी पाहता आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.


दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवडमुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड होत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये