Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

  48

सोलापूर : वरण किंवा कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असते. जेवणात लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लसणाची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील महिनाभरात लसणाची आवक घटल्याने १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण तब्बल ३५० रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर लसणाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही काही दिवस सर्वसामान्यांना लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तर खराब हवामानामुळेही अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान आणि ग्राहकांची मागणी पाहता आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.


दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवडमुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड होत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक