Assembly Election 2024 : येत्या २४ तासात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता!

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार तसेच आचारसंहिता (Code Of Conduct) कधीपासून लागणार याबाबतची चर्चा सुरु असताना राजकीय रिंगणातून मोठी बातमी समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारबाबात महत्त्वाचे निर्णय मांडण्यात येणार असून येत्या २४ तासांत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी


१० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज किंवा उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागली जाऊ शकते, असे वक्तव्य राज्यातील काही नेत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी