सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून चार दिवस बंद; 'असे' असतील पर्यायी मार्ग!

सोलापूर : कोजागिरी पोर्णिमा (Sharad Purnima) आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या (Tuljabhavani Devi) दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत येतात. मात्र सदर मार्गावर जाणाऱ्या वाहनांमुळे पायी दर्शनाकरीता तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाकडून उद्यापासून पुढील चर दिवस सोलापूर ते तुळजापूर मार्गावर वाहनांसाठी बंद ठेवण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग सुद्धा दिले आहेत.



काय आहेत पर्यायी मार्ग?


सोलापूर तुळजापूर मार्ग सोमवार रात्रीपासून चार दिवस बंद राहणार असल्यामुळे सोलापूर ते तुळजापूर या मार्गाने जाणारी वाहतूक सोलापूर ते तांदुळवाडी खानापुर ते तुळजापूर अशी वळविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी