Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का! रोहित शर्मा घेणार माघार?

मुंबई : क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) धक्कादायक निर्णय घेतला आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही महत्तवाची मालिका असून यामध्ये भारतीय संघ एकूण पाच कसोटी सामने खेळणार आहे. परंतु बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील काही सामन्यांमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे.


रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित शर्माने अधिकृपणे कोणतीही घोषणा केली नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा तपशील दिला आहे.


दरम्याम, संघ व्यवस्थापनासमोर रोहितच्या जागी भारताचा कर्णधार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या