Garba Pass Scam : मुंबईत गरब्याचे बनावट पासेस

मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांच्या ‘गरबा पास स्कॅम’चा पर्दाफाश


मुंबई : देशभरात नवरात्री उत्सवाची धूम सुरू असून विविध ठिकाणी गरबा-दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवात बाहेरील लोकांपासून सुरक्षा राखण्यासाठी प्रवेश तिकीट किंवा पासेसद्वारे दिला जातो. मात्र, मुंबईतील काही कॉलेज विद्यार्थ्यांनी याचाच गैरफायदा घेत ‘गरबा पास स्कॅम’ (Garba Pass Scam) रचल्याचे समोर आले आहे.


मुंबईच्या बोरिवली परिसरात रायगड प्रतिष्ठान आयोजित 'रंग रास गरबा' कार्यक्रमासाठी ६०० बनावट सीझन पास तयार करून विकण्याच्या आरोपात सहा विद्यार्थ्यांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी, वय १८ ते २० वर्षे आहे. हे सर्वजण कॉलेज विद्यार्थी असून त्यात मनोज वेशी चावडा (१९), अंश हितेश नागर (२०), भव्य जितेंद्र मकवाना (१९), राज शैलेश मकवाना (१९), यश राजू मेहता (१९) आणि केयूर जगदीश नाई (२०) यांचा समावेश आहे.


या टोळीने नवरात्री काळात कमी दिवसांत मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने ६०० बनावट गरबा पास तयार केले. त्यांची एकूण किंमत अंदाजे ६ लाख रुपये होती.


मुंबईत कॉलेज विद्यार्थ्यांनी केलेल्या 'गरबा पास' स्कॅममधून, ६०० बनावट पासेस विकून लाखोंची कमाई करणार होते. मात्र सोमवारी (७ ऑक्टोबर) संध्याकाळी, दोन तरुणांनी हे पास वापरून गरबामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान पासवरील बारकोड स्कॅन न झाल्याने सुरक्षारक्षकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.


पोलिसांनी चौकशीदरम्यान या टोळीचा भांडाफोड केला व बनावट पास बनवण्याचे साहित्य जप्त केले. आरोपींनी आणखी किती पासेस तयार केले आहेत, किती जणांना विकले आहेत आणि या स्कॅममध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही