RBI Repo Rate : सलग दहाव्यांदा आरबीआयचा रेपो दर जैसे थे!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत आज, बुधवारी रेपो दर जैसे थे (RBI Repo Rate) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सलग दहाव्या वेळी रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे.


पतधोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी सांगितले की, समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूने मत दिले. रिझर्व्ह बँकेने मागील नऊ क्रेडिट पॉलिसींमध्ये म्हणजे फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत म्हणजे आरबीआयने पत धोरणातील दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवले आहेत. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) बैठक ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यानंतर उपरोक्त स्थिती जाहीर करण्यात आली आहे.



आरबीआयच्या निर्णयाचा सामान्यांवर परिणाम


रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यास बँकांना मिळणारे कर्ज महाग होते. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाचे व्याजदर वाढवतात. त्यामुळे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर अधिक व्याज द्यावे लागते. रेपो दर कमी झाल्यास ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागते.



'रेपो दर' म्हणजे काय?


देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक निधीची कमतरता असल्यास व्यावसायिक बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर होय. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी आरबीआयकडून रेपो दर कमी जास्त करण्यात येतो. चलनवाढीच्या प्रसंगी, रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते, त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो / तरलता कमी होते आणि त्यामुळे चलनवाढ रोखण्यात मदत होते.

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३