RBI Repo Rate : सलग दहाव्यांदा आरबीआयचा रेपो दर जैसे थे!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत आज, बुधवारी रेपो दर जैसे थे (RBI Repo Rate) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सलग दहाव्या वेळी रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे.


पतधोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी सांगितले की, समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूने मत दिले. रिझर्व्ह बँकेने मागील नऊ क्रेडिट पॉलिसींमध्ये म्हणजे फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत म्हणजे आरबीआयने पत धोरणातील दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवले आहेत. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) बैठक ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यानंतर उपरोक्त स्थिती जाहीर करण्यात आली आहे.



आरबीआयच्या निर्णयाचा सामान्यांवर परिणाम


रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यास बँकांना मिळणारे कर्ज महाग होते. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाचे व्याजदर वाढवतात. त्यामुळे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर अधिक व्याज द्यावे लागते. रेपो दर कमी झाल्यास ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागते.



'रेपो दर' म्हणजे काय?


देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक निधीची कमतरता असल्यास व्यावसायिक बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर होय. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी आरबीआयकडून रेपो दर कमी जास्त करण्यात येतो. चलनवाढीच्या प्रसंगी, रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते, त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो / तरलता कमी होते आणि त्यामुळे चलनवाढ रोखण्यात मदत होते.

Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे