आईने दुसरे लग्न केल्याने आठ वर्षीय मुलाची आत्महत्या

  191

भाईंदर : पहिल्या पतीपासुन झालेल्या मुलाचा विचार न करता त्याला अनाथ आश्रमात टाकून पहिला नवऱ्याच्या निधनानंतर दुसरे लग्न करून संसार थाटलेल्या आईचा विरह सहन न झाल्याने तणावग्रस्त अवस्थेत असलेल्या आठ वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भाईंदर येथे घडली आहे.


पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न करून पहिल्या पतीपासुन झालेल्या आठ वर्षीय मुलाला भाईंदर येथिल केअरींग हँड्स सेवा कुटीर या संस्थेत ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यातच मुलाची आई त्याला भेटायला आली होती. तेव्हा त्याने मला येथे राहायचे नाही तू मला घेऊन चल असा तगादा लावला होता. संस्थेच्या लोकांना सुध्दा तो असेच सांगत असे. परंतू आईने असमर्थता दाखवली होती. त्यामुळे मुलाला प्रचंड नैराश्य आले होते.


मंगळवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर त्याने आश्रमातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा संस्थेचे कर्मचारी व मुले उठली तेव्हा एक मुलगा कमी असल्याने शोधाशोध सुरू झाली आणि सदर प्रकार उघडकीस आला.


संस्थेने उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठविला असता शवविच्छेदन अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुलाच्या आईला संपर्क करून माहिती देऊन सायंकाळी मृतदेह आईकडे सोपवण्यात आला.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती