मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईकर हैराण झाले, असतानाच बुधवारी परतीच्या पावसाच्या सरीने मुंबईकर चिंब झाले. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने घामाघूम झालेले मुंबईकर सुखावले. मुंबईत रविवार पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई आणि परिसरात बुधवारी दुपारनंतर आकाश ढगाळ होत मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कमाल तापमान सुमारे अडीच अंश सेल्सिअसने कमी होत गारवा निर्माण झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.
मुंबईत कुलाबा येथे सायंकाळपर्यंत ०.४ मिमी पाऊस नोंदला गेला. सांताक्रुझ येथे तुरळक सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा- ३० अंश, तर सांताक्रुझ- ३०.६ अंश नोंदले गेले. त्यात २.६ अंशाची घट झाली आहे. किमान तापमान कुलाबा-२५.९ तर सांताक्रुझ २६.३ अंश सेल्सिअस होते. त्यातील घट १.४ अंशापर्यंत होती.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…