Share Market : सावधान! शेअर बाजारात भीतीचे दडपण कायम!

मुंबई : गेल्या आठवड्यात युद्धाचे सावट, विदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे फिरवलेली पाठ तसेच इतर घडामोडीमुळे (Share Market) सेन्सेक्स तब्बल ४००० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये याच कालावधीत २००० अंकांची पडझड झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांची (stock market) चिंता वाढली होती. पण आज आठवड्याची सुरुवात पॉझिटिव्ह केली आहे. मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला आहे. मात्र अजूनही बाजारात पडझड सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


भारतीय शेअर मार्केटमध्ये नुकताच आठवड्यातील सर्वाधिक घसरणीचा रेकॉर्ड झाला. जून २०२२ नंतर प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये इतकी मोठी पडझड झाली. २७ सप्टेंबरपासून देशांतर्गत बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरूच असून मागील आठवड्याभरातील पाच व्यापार दिवसांत सेन्सेक्स उच्चांकी पातळीवरून ४,१०० हून अधिक अंकांनी आपटला तर निफ्टी १२०० हून अधिक अंकांनी कोसळला. अशाप्रकारे शेअर बाजारातील गंटागळीत कंपन्यांसह गुंतवणूकदारांना १६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. ही जून २०२२ नंतर शेअर बाजारातील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. त्यातच इराण-इस्रायल संघर्ष आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनच्या उपाययोजनांमुळे बाजारात गळती सुरू झाली असून घसरणीचा ट्रेंड अजून थांबलेला नाही. नवीन आठवड्यात बाजारात आणखी घसरण दिसून येऊ शकते. मध्यपूर्वेतील तणावाची परिस्थिती, चीन, परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री याशिवाय काही इतर घटकही बाजाराला आणखी खाली खेचू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.


मध्य-आशियातील या दोन्ही देशांमधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका आणि नाटो देशांच्या मदतीने इस्रायल इराणच्या तेल केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच इस्त्रायलवर हल्ला झाल्यास जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकते, अशीही चर्चा असून याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येईल आणि भारतीय मार्केटही त्याला अपवाद ठरणार नाही.


दुसरीकडे डबघाईला आलेल्या चीनच्या शेअर मार्केटमध्ये मात्र सतत तेजीचा ट्रेंड दिसत आहे. अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला चालना देण्यासाठी चीन सरकारने अलीकडेच अनेक सवलती जाहीर केल्या. ज्याअंतर्गत सरकारने मालमत्ता बाजाराला चालना देण्यासाठी बँकांना १४० अब्ज डॉलर्सचे प्रोत्साहन दिले. तसेच गृहकर्जाचे दरही कमी केले ज्यामुळे बाजारात तेजी खरेदी वाढली. परदेशी गुंतवणूकदारांचा कल देखील चीनकडेच आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा लावला असून शुक्रवारी सुमारे ९९०० कोटी काढून घेतले तर गेल्या एका आठवड्यात ३७ हजार कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. तसेच आता नवीन आठवड्यात विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चीनकडे जाऊ शकतात.


सोमवारपासून आरबीआयची पतधोरण बैठक सुरू होत असून ९ ऑक्टोबर, बुधवारी व्याजदराबाबत समितीचा निर्णय जाहीर केला जाईल. आरबीआयकडून सलग दहाव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले जाऊ शकतात. चालू आर्थिक वर्षात आरबीआयच्या पतधोरणात कोणताही बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


तसेच लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच दोन राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्या. ज्यांच्या एक्झिट पोलने दिलेल्या निकालांचा बाजाराच्या वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने आले नाहीत तर बाजारातील पडझड आणखी वाढू शकते. हरियाणात गेल्या दहा वर्षांपासून भाजपाचे सरकार असून यंदाच्या निवडणुकीनंतर फेरबदल होण्याची चर्चा आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही अनेक वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. येथेही भाजपाला मोठे आव्हान असल्याने बाजारात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Diwali Bonus Son papdi : 'बोनसऐवजी सोनपापडी' मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचा 'सूड'; संतप्त कामगारांनी मिठाईचे बॉक्स गेटबाहेर दिले फेकून, Video व्हायरल

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची

PM Modi On Trump Phone Call : ट्रम्प म्हणाले 'ट्रेड', तर मोदींनी दिले 'दहशतवादा'वर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत! फोन कॉलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

Chhath Puja Special Railway : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वे सज्ज! प्रवाशांची विक्रमी गर्दी पाहता १२०००+ विशेष गाड्या धावणार; सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी रेल्वे, बस किंवा विमानाने आपल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या