भुयारी मेट्रोत पहिल्याच दिवशी बिघाड; दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांचा खोळंबा

Share

मुंबई : भुयारीमेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाला आहे. सोमवारी सकाळी मेट्रो सुरू होताच तांत्रिक बिघाड झाला. पाच ते सात मिनिटे मरोळ स्थानकावरतीच रखडली होती. दरवाजे बंद झाले होते, त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी अकरा वाजता ही मेट्रो सुरू झाली.

अशा प्रकारे बहुप्रतीक्षित अशी संपूर्ण भुयारी मेट्रो ३ मार्गिका अखेर मुंबईकरांना प्रवासासाठी खुली झाली. सोमवारी मेट्रो ३ची पहिली गाडी आरे येथून सकाळी ११ वाजता सुटली. आजपासून मात्र सकाळी ६.३० वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रा ३ ही एकूण मार्गिका ३३.५ किमीची असली तरी आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा १२.६९ किमी अंतराचा आहे. या टप्प्यात दहा स्थानके आहेत. ताशी ९५ किमी इतका या मेट्रोचा वेग आहे. त्यामुळे आरे ते बीकेसी हा प्रवास आता केवळ २२ मिनिटांत करता येणार आहे.

रोज सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत मेट्रो-३ची सेवा सुरू राहील. सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मेट्रो सेवा सुरू होईल. रोज ९६ फेऱ्या चालवल्या जातील. दर ६ मिनिटे ४० सेकंदांनी मेट्रो सोडली जाईल. किमान १० रुपये ते कमाल ५० रुपये तिकीट दर असेल. आरे ते कफ परेड संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर मात्र तिकीटदर आणि फेऱ्यांच्या संख्येत बदल होईल. संपूर्ण मार्गिकेसाठी कमाल तिकीट दर ७० रुपये असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत एकात्मिक तिकीट प्रणाली उपलब्ध होईल. यामुळे सर्व मेट्रो मार्गिकांवर एकाच तिकिटाद्वारे प्रवास करता येईल. पहिल्या टप्प्यातील मेट्रो ३ मार्गिका मेट्रो १ मार्गिकला मरोळ नाका येथे जोडेल.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

13 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

34 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago