Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीया ३ लोकांच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, तुम्ही त्यातलेच आहात का?

या ३ लोकांच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, तुम्ही त्यातलेच आहात का?

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोकांना त्यांच्या चुकांमुळे नेहमी रिकाम्या खिशाला सामोरे जावे लागते. आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही व्यक्तीला व्यर्थ पैसे खर्च केले नाही पाहिजे. वायफळ खर्च करणाऱ्या व्यक्तीच्या हातात कधीही पैसे टिकत नाहीत.

आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती वायफळ खर्च करते ती व्यक्ती नेहमीच कंगाल राहते. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने उगाचच खर्च न करता बचत केली पाहिजे.

जी व्यक्ती दान देण्यासारख्या चांगल्या कार्यात कधीही पैसा खर्च करत नाही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. जे लोक दान करत नाही त्यांचे धन दुसऱ्या कोणत्या ना मार्गाने संपून जाते. व्यक्तीने वेळोवेळी दान केले पाहिजे.

जे मेहनती नसतात, ज्यांच्यात आळस भरलेला असतो त्यांच्या हातात कधीही धन टिकत नाही. अशा व्यक्तींवर लक्ष्मी माता नेहमी नाराज असते. त्यांना नेहमीच पैशांची आर्थिक तंगी सोसावी लागते. त्यांच्या जीवनात आनंदीआनंद येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -