ऑस्ट्रेलिया मालिकेआधी भारतासाठी धोक्याची घंटा

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात २७ सप्टेंबरपासून कानपूर कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज यांनी जबरदस्त फॉर्म दाखवला.


भारताने या सामन्यात बांगलादेशला ७ विकेटनी हरवत मालिका २-० अशी जिंकली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला होता. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला होता. रोहित मालिकेत एकूण ५० धावाही करू शकला नाही.


तर विराट कोहलीला संपूर्ण मालिकेत १०० धावाही करता आल्या नाहीत. अशातच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी दोघांचा फॉर्म भारतासाठी धोक्याची घंटाच आहे.

रोहितने बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या ४ डावांमध्ये एकूण ४२ धावा केल्या. त्याची सरासरी खूप खराब म्हणजेच १०.५० इतकी होती. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या २३ इतकी होती.

दुसरीकडे विराट कोहली आहे ज्याने ४ डावांत मिळून ९९ धावा केल्या. कोहलीची या मालिकेतील सरासरी ३३ इतकी होती. मालिकेच्या टॉप ३ स्कोररमध्ये भारतीय फलंदाज राहिले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जायसवालने १८९, शुभमन गिलने १६४ आणि ऋषभ पंतने १६१ धावा केल्या.
Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज