ऑस्ट्रेलिया मालिकेआधी भारतासाठी धोक्याची घंटा

  78

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात २७ सप्टेंबरपासून कानपूर कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज यांनी जबरदस्त फॉर्म दाखवला.


भारताने या सामन्यात बांगलादेशला ७ विकेटनी हरवत मालिका २-० अशी जिंकली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला होता. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला होता. रोहित मालिकेत एकूण ५० धावाही करू शकला नाही.


तर विराट कोहलीला संपूर्ण मालिकेत १०० धावाही करता आल्या नाहीत. अशातच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी दोघांचा फॉर्म भारतासाठी धोक्याची घंटाच आहे.

रोहितने बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या ४ डावांमध्ये एकूण ४२ धावा केल्या. त्याची सरासरी खूप खराब म्हणजेच १०.५० इतकी होती. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या २३ इतकी होती.

दुसरीकडे विराट कोहली आहे ज्याने ४ डावांत मिळून ९९ धावा केल्या. कोहलीची या मालिकेतील सरासरी ३३ इतकी होती. मालिकेच्या टॉप ३ स्कोररमध्ये भारतीय फलंदाज राहिले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जायसवालने १८९, शुभमन गिलने १६४ आणि ऋषभ पंतने १६१ धावा केल्या.
Comments
Add Comment

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय